J N Saibaba Case: नक्षलवाद्यांशी लढताना ज्यांना आपला जीव गमवावा लागतो किंवा या लढ्यातील जे पोलrस, जवान शहीद होतात, त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा निकाल अतिशय धक्कादायक आणि निराशाजनक आहे.

हायलाइट्स:
- नागपूर खंडपीठाकडून साईबाबाची निर्दोष मुक्तता
- देवेंद्र फडणवीसांकडून नाराजी व्यक्त
- निकालाविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, नक्षलवाद्यांशी लढताना ज्यांना आपला जीव गमवावा लागतो किंवा या लढ्यातील जे पोलrस, जवान शहीद होतात, त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा निकाल अतिशय धक्कादायक आणि निराशाजनक आहे. या निकालाविरोधात आम्ही तातडीने सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. ज्याच्याविरोधात भक्कम पुरावे आहेत, त्याला केवळ विलंबाने खटल्याची परवानगी मिळाली, या एका तांत्रिक कारणामुळे सोडून देणे, हा त्या शहीद कुटुंबांप्रति अन्यायकारक आहे. हे आम्ही सारे सर्वोच्च न्यायालयात योग्यप्रकारे मांडू आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. या निकालामुळे त्या कुटुंबीयांना काय वाटत असेल, याचा विचार मी वारंवार करतो आहे, असं उपमुख्यमंत्री म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
कथित माओवादी हेम मिश्रा याला गडचिरोली पोलिसांनी अटक केली होती. दलम कमांडर नर्मदाक्का हिच्याकडे तो संदेश घेऊन जात होता आणि हा संदेश साईबाबांनीच पाठविला होता, असा आरोप पोलिसांनी हेम आणि साईबाबा यांच्यावर लावला होता. गडचिरोली पोलिसांनी दिल्ली येथून साईबाबा यांना अटक केली होती. प्रो. जी. एन. साईबाबा व पाच माओवाद्यांना मे २०१४ मध्ये अटक केली होती. त्यानंतर २०१७ मध्ये गडचिरोली कोर्टाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आज मुंबई हाय कोर्टाच्या नागपूर खंडपीठाने साईबाबाची निर्दोष मुक्तता केली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.