Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 15 Oct 2022, 8:37 am
Thane News : भिवंडी येथील चिराडपाडा गावातील फुलोरे या पाड्यामध्ये राहणाऱ्या दोन तरुणींच्या अंगावर विज पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल शुक्रवारी संध्याकाळी घडली आहे. दोन्ही तरुणींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पडघा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

हायलाइट्स:
- वीज पडून दोन तरुणींचा मृत्यू
- दोन जण जखमी
- भिवंडीतील धक्कादायक घटना
शुक्रवारी संध्याकाळी ठाणे तालुक्यात विजेच्या कडकडाटांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी चार ते सात या तीन तासाच्या कालालवधीत मोठ्या प्रमाणात पाऊस आणि विजा कोसळत होत्या. याच दरम्यान शितल, योगिता, सुगंधा आणि रोशन मासे पकडण्यासाठी भातसा नदीवर गेले होते. सायंकाळी ५.३० च्या सुमारास पावसाचा जोर वाढल्याने चौघे जण घरी परतत होते.
मात्र, याच वेळेस रस्त्यात शितल आणि योगिता या दोघींवर वीज कोसळली. यात त्या दोघींचा जागीच मृत्यू झाला. तर सुगंधा आणि रोशन हे जखमी झाले आहेत. सुगंधा यांना भिवंडी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर रोशन याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या शितल आणि योगिता या दोघींचे मृतदेह पडघा येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
इंदापुरात महादेव जानकरांनी नवा चेहरा आणला, भरणे आणि हर्षवर्धन पाटलांचंही टेन्शन वाढवलं
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.