ठाणे : देशभरातून अनेकजण नोकरी, व्यवसाय करण्यासाठी तसेच आपलं नशीब आजमवण्यासाठी मुंबईत येत असतात. असाच एक तरुण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी बिहारहून मुंबईला आला होता. पण काळाने घाला घातला आणि त्याने आपला जीव गमावला. एक्सप्रेसमधून रेल्वे रुळावर पडून नोकरीच्या शोधात मुंबईत आलेल्या तरुणाने आपला जीव गमावला आहे.

राजेंद्र कोंडा असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. राजेंद्र हा मूळचा बिहारचा होता. कामाच्या शोधात हा तरुण आपल्या नातेवाईकांसोबत मुंबईत आला होता. बागलपूर एक्सप्रेसने आलेलं हे कुटुंब रेल्वेत गर्दी असल्याने दरवाज्याजवळ उभा होता. ही गाडी कल्याण ते ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान आली असता राजेंद्र कोंडा याचा तोल जाऊन तो खाली पडला. नातेवाईकांना स्थानकावर उतरुन पुन्हा लोकल ट्रेनने कल्याण रेल्वे स्थानक गाठलं. कल्याण रेल्वे स्थानकात नातेवाईकांनी राजेंद्रचा शोध घेतला. मात्र, त्यांना राजेंद्र कुठेच सापडला नाही. अखेर कुटुंबीयांनी डोंबिवली रेल्वे पोलीस ठाणे गाठलं आणि राजेंद्र सापडत नसल्याबाबतची तक्रार नोंदवली.

ठिय्या आंदोलन करणाऱ्या खडसेंना दणका; ३० वर्षांपासूनचे सुरक्षा कवच काढून घेतले
रेल्वे पोलिसांनी तात्काळ तक्रार दाखल करुन घेत राजेंद्रचा शोध सुरु केला. कल्याण ते ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान, पाचव्या आणि सहाव्या रेल्वे लाईनच्या खालील नाल्याच्या वाहत्या पाण्याच्या बाजूकडील कठड्याजवळ पोलिसांना राजेंद्रचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि ओळख पटवण्यासाठी नातेवाईकांना बोलावलं. नातेवाईकांना मृतदेह दाखवल्यानंतर त्यांनी हा मृतदेह राजेंद्रचाच असल्याचं सांगितलं. रेल्वे पोलिसांनी आवश्यक बाबींती पूर्तता करुन मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. डोंबिवली जीआरपी पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.

दरम्यान, दरवर्षी लाखो तरुण देशभरातून पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत येतात. राजेंद्र त्यापैकीच एक होता. पण काळाने घाला घातला आणि आपली स्पप्न पूर्ण करण्यासाठी गावाहून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या राजेंद्रच्या स्वप्नांना कायमचाच पूर्णविराम लागला.

इंदापुरात महादेव जानकरांनी नवा चेहरा आणला, भरणे आणि हर्षवर्धन पाटलांचंही टेन्शन वाढवलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here