ते म्हणाले की अमेरिकेतील आर्थिक मंदीमुळे कच्च्या तेलाच्या किमती घसरत आहेत आणि त्यामुळे भारताचा पेमेंट बॅलन्स सुधारतो. याशिवाय चलन खर्चही कमी होतो. गेल्या ४० वर्षांच्या इतिहासावर नजर टाकली तर लक्षात येईल की, अमेरिकेच्या मंदीशिवाय भारतात कधीही शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली नाही.
खरंच मंदी आली का? कसं कळणार? झळ कमी करण्यासाठी तुम्ही काय कराल
‘आयटी कंपन्या दीर्घकाळात चांगली कामगिरी करतील’
या खास संवादात सौरभ मुखर्जी यांनी मध्यम आणि दीर्घकालीन आयटी समभागांवर आपले मत मांडले. ते म्हणाले की टीसीएस, इन्फोसिस आणि एचसीएल टेकसारख्या कंपन्या खूप चांगली कामगिरी करत आहेत आणि त्यांचे मजबूत परिणाम पाहता ते पुढेही चांगली कामगिरी करत राहतील असे दिसत आहे. भारतीय आयटी कंपन्यांना जागतिक कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळत राहतील. दुसरीकडे, ऑटो सेक्टरबद्दल बोलताना सौरभ मुखर्जी म्हणाले की, करोना संसर्गानंतर ४ चाकी वाहनांच्या सेगमेंटमध्ये वाढलेल्या मागणीमुळे ऑटो सेक्टरमध्ये वाढ होत आहे. दरम्यान, कमकुवत मागणीमुळे दुचाकी विभागावर दबाव कायम आहे.
फेड रिझर्व्हची दरवाढ
अमेरिकेतील वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी फेडरल रिझर्व्ह व्याजदरात सातत्याने वाढ करत आहे., ज्याचा परिणाम अमेरिकेसह जगभरातील अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारांवर होत आहे. गेल्या काही दिवसांत अमेरिका, युरोप आणि इतर जागतिक बाजारपेठांमध्ये मोठी घसरण झाली आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारातही दिसून आला. मात्र, जागतिक बाजाराच्या तुलनेत भारतात कमी घसरण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय अमेरिकेतील मंदीमुळे भारतातील विदेशी गुंतवणूक आणखी वाढेल. चांगल्या परताव्याच्या शोधात गुंतवणुकदार भरताकडे वळतील आणि विदेशी गुंतवणुकीमुळे रुपयाचे स्थान बळकट होईल. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे स्थान उंचावेल.
शेअर बाजाराची सुरुवात
आठवड्याच्या शेवटच्या दिवसाच्या सुरुवातीच्या व्यवहाराच्या सुरुवातीस जागतिक उत्साह आणि मजबूत IT परिणामांमुळे शेअर्सला चालना मिळाल्याने भारतीय बेंचमार्क निर्देशांकांनी सेन्सेक्स १,००० अंकांनी आणि निफ्टीने २५० अंकांहून अधिक उसळीसह उघडला. यादरम्यन एचसीएल टेक, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा यांच्या नेतृत्वाखाली निफ्टी आयटी निर्देशांक २.६ टक्क्यांनी वाढल्याने सर्व क्षेत्रांनी हिरवा व्यापार केला.