परतीच्या पावसाने सोलापूर जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, अकलूजआदी भागात मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील उभ्या पिकात पाणीच पाणी साचले आहे

शेतातील उभ्या पिकात पाणीच पाणी
वाचाः गोव्याला जायचा प्लॅन करताय मग बजेट वाढवा; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
लाखो हेक्टर शेतजमिनी जमिनी पाण्याखाली
बार्शी, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, अकलूज, मोहोळ आदी भागातील शेतजमिनीत पाणी साचले आहे. लाखो शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. छोट्या मोठ्या ओढ्यांना नदीचे स्वरूप आले आहे. छोट्यामोठया नद्या नाल्यामधील पाणी शेतात पसरले आहे. विमा कंपन्यांनी सुद्धा पाहणी केली नसून जिल्हा प्रशासनाने सुद्धा पाठ दाखवली आहे. यंदाच्या दिवाळीत गोडधोड ऐवजी पाणीच नशिबी आले असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.