Patil Prashant | Maharashtra Times | Updated: 16 Oct 2022, 1:51 pm
Wardha News : वर्ध्याच्या महात्मा गांधी अंतराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातील वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या निघत असल्याने विद्यार्थी त्रस्त झालेय. रात्री जेवणात अळ्या निघाल्याने काही विद्यार्थ्यांची प्रकृती अस्वस्थ झाली.

हायलाइट्स:
- विद्यार्थ्यांनी केले मध्यरात्री आंदोलन
- जेवणात दिसतायेत अळ्या
- जेवणानंतर १३ विद्यार्थ्यांना उलट्या
दीड ते दोन महिन्यांपासून हा प्रकार सतत होत असल्याने वसतिगृहातील विद्यार्थी चांगलेच संतापले आहेत. रात्रीच्या जेवणात देखील अळ्या निघाल्या. तब्बल १३ विद्यार्थ्यांना उलट्या झाल्या. प्रकृती अस्वस्थ झाल्याने संतापलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या वसतिगृहातच आंदोलन सुरू केले. रात्री ९ वाजेपासून सुरु झालेले आंदोलन रात्री २ वाजेपर्यंत सुरु होते.
प्रकृती अस्वस्थ झालेल्यांमध्ये ५ मुली आणि ८ मुलांचा समावेश आहे. “भारत माता की जय”च्या घोषणा देत विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मेसच्या जेवणाचे पैसे घेऊन देखील योग्य भोजन मिळत नसल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. अखेर विद्यापीठ प्रशासनाने मध्यरात्री विद्यार्थ्यांशी चर्चा केली आणि तोडगा काढला असल्याचे सांगितले जात आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.