Raj Thackeray on Andheri Byelection | राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाने २००९ आणि २०१३ सालच्या विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व मतदारसंघात चांगली मते मिळवली होती. सध्याच्या घडीला मनसेला फारशी मतं मिळतील, अशी स्थिती नसली तरी मुंबईतील मराठी जनमानसावर राज ठाकरे यांचा प्रभाव आहे. राज ठाकरे यांच्या वकृत्त्वाची शैली बाळासाहेबांशी मिळतीजुळती असल्याने मराठी मतदारांमध्ये राज यांच्याविषयी आपुलकी आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी अंधेरी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने घेतलेली ‘न्युट्रल’ भूमिका निर्णायक ठरु शकते.

 

Raj Thackeray BJP Shinde Camp
अंधेरी पूर्व पोटनिवडणूक

हायलाइट्स:

  • राज ठाकरेंच्या भूमिकेने अंधेरी पोटनिवडणुकीत ट्विस्ट
  • मराठी मतं एकगठ्ठा ठाकरे गटाच्या बाजूने वळणार?
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणाचे केंद्र झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत दिवसागणिक नवनवे ट्विस्ट येताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वीच भाजप आणि ठाकरे गटाकडून पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते. त्यामुळे ही लढत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विरुद्ध भाजपचे मुरजी पटेल, अशी दुरंगी होणार, हे स्पष्ट झाले होते. परंतु, मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रविवारी देवेंद्र फडणवीस यांना लिहलेल्या पत्रामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri By-Election) नवा ट्विस्ट आला आहे. रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके बिनविरोध निवडून जाणे, हे महाराष्ट्राच्या परंपरेला आणि संकेताला धरून आहे. त्यामुळे भाजपनेही ही निवडणूक लढवू नये, अशी विनंती राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे ठाकरे गटाशी दोन हात करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे यांनी काही तासांपूर्वीच वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवार रिंगणात उतरला नसला तरी मूळ शिवसेनेची मते भाजपच्या मुरजी पटेल यांच्या बाजूने वळवण्यात एकनाथ शिंदे यांची भूमिका निर्णायक ठरेल. अंधेरी हा मिश्र लोकवस्तीचा भाग असला तरी सर्वाधिक मतदारांचा टक्का हा मराठी आहे. त्यामुळे मुंबईतील मराठी मतदारांवर प्रभाव टाकू शकणाऱ्या राज ठाकरे यांची भूमिकाही अंधेरी पोटनिवडणुकीत निर्णायक ठरणार होती. त्यामुळे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीत याविषयी चर्चा झाल्याचे बोलले जात होते. अंधेरी पूर्वतील मनसेचा मतदार भाजपकडे वळवण्यासंदर्भात या भेटीत खलबतं झाल्याचा अंदाज वर्तविला जात होता. परंतु, या भेटीला काही तास उलटत नाही तोच राज ठाकरे यांच्या अनपेक्षित भूमिकेने भाजप आणि शिंदे गटाची मोठी गोची झाली आहे.
Andheri Bypoll: राज ठाकरेंच्या पत्रानंतर देवेंद्र फडणवीसांच्या मनात ‘चलबिचल’, पण मित्राला आश्वस्त करणंही टाळलं!
राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाने २००९ आणि २०१३ सालच्या विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व मतदारसंघात चांगली मते मिळवली होती. सध्याच्या घडीला मनसेला फारशी मतं मिळतील, अशी स्थिती नसली तरी मुंबईतील मराठी जनमानसावर राज ठाकरे यांचा प्रभाव आहे. राज ठाकरे यांच्या वकृत्त्वाची शैली बाळासाहेबांशी मिळतीजुळती असल्याने मराठी मतदारांमध्ये राज यांच्याविषयी आपुलकी आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी अंधेरी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने घेतलेली ‘न्युट्रल’ भूमिका निर्णायक ठरु शकते. राज ठाकरे यांनी मनसेच्या मतदारांना मुरजी पटेल यांच्यापाठी उभे राहण्याचे आव्हान केले असते तर थोडी का होईना, पण मनसेची मतं भाजपला मिळाली असती. परंतु, राज ठाकरे यांनी या पोटनिवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यामुळे अंधेरी पूर्वमधील मराठी मतदार हा एकगठ्ठा ठाकरे गटाकडे वळू शकतो. राज ठाकरे यांच्या आव्हानानंतर एखाद्याला ठाकरे गटाला मतदान करायचे नसले तरी सहानुभूतीच्या फॅक्टरमुळे ही मतं शिवसेनेकडे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वळू शकतात. निश्चितच यामुळे उद्धव ठाकरे गटाला पोटनिवडणुकीत मोठा फायदा होऊ शकतो.

भाजप-शिंदे गटाची मेहनत पाण्यात

शिंदे गटाने अंधेरी पोटनिवडणुकीचे कारण पुढे करून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. या पोटनिवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या पक्षचिन्हाचा निकाल द्यावा, अशी मागणी लावून धरली. ही मागणी मान्य करत निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले होते. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाने अंधेरी पोटनिवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली होती. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी नवे चिन्ह आणि पक्षाचे नवे नाव मिळूनही, शिंदे गटाने आपला उमेदवार रिंगणात उतरवला नव्हता. त्यानंतर ऋतुजा लटके यांची राजीनाम्याच्या मुद्द्यावरुन कोंडी करून शिंदे गट आणि भाजपने ठाकरे गटाला जेरीस आणले होते.
राज ठाकरेंच्या भूमिकेने अंधेरीची गणितं पालटणार, ठाकरेंना मोठा दिलासा, आता लक्ष फडणवीसांच्या भूमिकेकडे!
यानिमित्ताने शिंदे गट आणि भाजपने ही पोटनिवडणूक आपण पूर्ण जोर लावून लढवू, असे संकेत दिले होते. यावरुन शिंदे गट आणि ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोपही झाले होते. त्यामुळे अंधेरी पूर्वची लढाई निकराची होणार, अशी चिन्हं दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटाकडून आक्रमकपणे वातावरणनिर्मितीही केली जात होती. परंतु, राज ठाकरे यांच्या एका ट्विटमुळे ही सगळी मेहनत आणि आक्रमकपणा पाण्यात जाण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी ऋतुजा लटके बिनविरोध निवडून याव्यात, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांच्याविषयी सामान्य मतदारांमध्ये असणारी सहानुभूती आणखी वाढेल. अशा वातावरणात भाजप आणि शिंदे गटाने कितीही आक्रमक प्रचार केला तरी त्यांची पोटनिवडणुकीत त्यांची डाळ शिजण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे आता भाजप आणि शिंदे गट अंधेरी पोटनिवडणुकीच्या लढाईतून माघार घेतात का, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here