
गुरा, ढोरासह अख्खं गाव काढलं विक्रीला, मराठवाड्यातील गावाचा मोठा निर्णय, प्रशासनाची धांदल…
“तसेच खाजगी फायनान्स कंपन्यांनी आम्हाला तगादा लावला आहे. त्यासोबतच कोरोना काळात शेतकरी मृत्युमुखी पडला असून या शेतकऱ्यांची कर्जमाफी द्यावी. हिंगोली जिल्हा आत्महत्याग्रस्त घोषित करण्यात यावा इत्यादी मागणीसाठी आम्ही सर्व ग्रामस्थ सर्वानुमती निर्णय घेतो की आमचे गाव, आमची गुरे,ढोरे, शेत जमीन विक्री आहे. तरी सरकारने दखल घेऊन आमच्या मागण्या मान्य करायला ही विनंती”.
असं या गारखेडागावातील गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रातून मुख्यमंत्र्याकडे वेदना मांडले आहे. अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही अनेक आंदोलन झाली,आश्वासन देऊनही मदतीचा लाभ न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे. त्याचबरोबर पिक विमा कंपन्या सुद्धा उटावून शेळ्या राखत असल्यामुळे पिक विमा पासून शेतकरी वंचित राहत आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी अशी सध्या सर्व स्तरातून मागणी करण्यात येत आहे.
पिक विमा अधिकाऱ्यांवर एफआयआर करा नाहीतर शिवसेना स्टाईल उत्तर, संतोष बांगरांकडून कार्यालयाची तोडफोड