महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्री असलेल्या बच्चू कडू यांचा हा मतदारसंघ आहे. खासदार नवनीत राणा व राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्यासारखे महत्त्वाचे नेते जिल्ह्यात असताना सुद्धा शासन स्तरावरून मार्गदर्शन आणि योग्य उपायोजना होत नसल्याने शेतकरी सातत्याने संत्राभागा उद्ध्वस्त करत असल्याचे दिसत आहे.
Home Maharashtra amravati farmer, शेतकरी वैतागला आणि थेट संत्र्यांच्या पिकाचा दशक्रिया विधी करून लाखोंची...
amravati farmer, शेतकरी वैतागला आणि थेट संत्र्यांच्या पिकाचा दशक्रिया विधी करून लाखोंची बाग केली उद्धवस्त, कारण… – the farmer destroyed his orange orchard with the help of jcb due to the disease on the crop
अमरावती : कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांचा सामना करावा लागणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था सध्या बिकट झाली आहे. राज्यातील विविध भागांमध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. तसंच दुसरीकडे पिकांवर पसरणाऱ्या विविध रोगांनीही बळीराजा अडचणीत आला आहे. अशातच अमरावती जिल्ह्यात आज एका शेतकऱ्याने आपल्यावर ओढावलेल्या संकटानंतर चक्क संत्रा झाडांचा दशक्रिया विधी घालत स्वतःच जेसीबीच्या माध्यमातून संत्रा भाग उद्ध्वस्त केल्याची घटना समोर आली आहे.