Maharashtra Politics | ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेतील एका भाषणावरून सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या भाषणात सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री केली होती. याविषयी प्रकाश आंबेडकर यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले होते की, कोण या सुषमा अंधारे, यांना मी ओळखत नाही. चळवळीच्या ठिकाणी माझी त्यांच्याशी भेट झाली असे मला वाटत नाही, असे म्हटले होते.

हायलाइट्स:
- मी दुर्गम पहाडी भागातील ‘वंचित’ घटकातील आहे
- माझ्यासारख्या वंचितांची ओळख त्यांना असावी हे अपेक्षितही नाही
प्रकाश आंबेडकर यांच्या या खोचक टीकेला सुषमा अंधारे यांनी आपल्या खास शैलीत चोख प्रत्युत्तर दिले. “प्रकाश आंबेडकर मला ओळखत नाही असं विधान केल्याने काही भावंडांना थोडसं वाईट वाटलं आणि ते चिडून काहीबाही लिहीत आहेत. पण मला वाटतं आपण चिडू नये. कदाचित नसतील ते ओळखत काय हरकत आहे ? मला त्यांनी ओळखावं यासाठी मी काही देवेंद्र फडणवीस नाही किंवा आरएसएसचा फार मोठा पदाधिकारी नाही, किंवा कुणी मुख्यमंत्री अथवा या देशाचा पंतप्रधान नाही किंवा मी फार कुणी मोठी अब्जाधीश व्यक्ती नाही किंवा मला फार मोठा भव्य दिव्य काही राजकीय वारसाही नाही, असा टोला सुषमा अंधारे यांनी प्रकाश आंबेडकरांना लगबला आहे.
मी दुर्गम पहाडी भागातील ‘वंचित’ घटकातील आहे. तेव्हा माझ्यासारख्या वंचितांची ओळख त्यांना असावी हे अपेक्षितही नाही. पण मी त्यांना ओळखते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नावातील आंबेडकर नाव हे त्यांच्या नावाशी जोडलेले आहे. त्यामुळे मी त्यांना निश्चितच ओळखते.त्यांच्या निरोगी दीर्घायुष्याची कामना जशी प्रत्येक वाढदिवसाला करते तशीच आजही करते, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.
शिवसेना-वंचित संभाव्य युतीच्या आधीच नेते भिडले
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांना युतीचा प्रस्ताव दिला आहे, पण अजून त्यांच्याकडून कोणतंही उत्तर आलेलं नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले होते. त्यानंतर आता वंचित-शिवसेना संभाव्य युतीच्या आधीच दोन बडे नेते भिडल्याने या होऊ घातलेल्या युतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा रंगली आहे.
बाई म्हणून हलक्यात नाही घ्यायचं मला, लक्षात ठेवा; सुषमा अंधारेंचा विरोधकांना सज्जड इशारा
प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले होते?
ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेतील एका भाषणावरून सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या भाषणात सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री केली होती. याविषयी प्रकाश आंबेडकर यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले होते की, कोण या सुषमा अंधारे, यांना मी ओळखत नाही. चळवळीच्या ठिकाणी माझी त्यांच्याशी भेट झाली असे मला वाटत नाही. चारित्र्य बघायला पाहिजे. केतकीने सुद्धा मिमिक्री केली. तिनं रिट्वीट केलं. तिच्यावर कारवाई झाली की नाही? लोकं शहाणे झाले आहेत, अशी टिप्पणी प्रकाश आंबेडकर यांनी केली होती.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.