रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचे वर्चस्व कायम राहिले असून भाजप आणि शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. प्रस्थापित उमेदवारांना येथे मतदारांनी नाकारले आहे, तर दापोली मंडणगड तालुक्यात शिंदे गटाचे वर्चस्व कायम असून आमदार योगेश कदम यांच्या समर्थकांना यश मिळालं आहे.

गुहागर तालुक्यातील अंजनवेल आणि वेलदूर या ग्रामपंचायतींवर गेली १० वर्ष भाजपचे वर्चस्व होते. या ठिकाणी भाजपला मोठा धक्का बसला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने इथं बाजी मारली आहे. अंजनवेल आणि वेलदूरमध्ये ठाकरे गटाचे पुरस्कृत पॅनल विजयी झाले आहेत. दिव्या सुमित वनकार वेलदूर सरपंचपदी विजयी झाल्या असून सोनल रामनाथ मोरे या अंजनवेल येथील सरपंच झाल्या आहेत.

Andheri bypoll: भाजपच्या मुरजी पटेलांनी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया

दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षासोबत असणाऱ्या रामदास कदम यांचे पुत्र आणि दापोली-मंडणगडचे आमदार योगेश कदम यांची तालुक्यात सरशी झाली असून १० पैकी ८ ग्रामपंचायतींवर बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचा भगवा फडकला आहे.

दरम्यान, खरंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्षीय चिन्हावर लढवल्या जात नाहीत. मात्र विधानसभा मतदारसंघांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांसह स्थानिक नेते या निवडणुकीसाठी आपले राजकीय कसब पणाला लावतात. कारण या निवडणुकांमध्ये मिळालेली ताकद पुढे तालुका पातळीवरील निवडणुकीसाठी उपयुक्त ठरते. त्यातच राज्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या उलथापालथीमुळे सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकींना आक्रमकपणे सामोरे गेले होते.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here