मुंबईः गेल्या दोन दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या पावसाला पुन्हा एकदा मुंबईसह राज्यात सुरुवात झाली आहे. मंगळवारी सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरात तुरळक ठिकाणं पावसानं झोडपून काढली आहेत. उद्या देखील पावसाचा जोर कायम राहणार असून मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

मुंबई शहर व उपनगरात आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. गेल्या सहा तासांत मुंबई आणि परिसरात ४० मीमी पावसाची नोंद झाली आहे. दुपारी पावसानं काही काळ विश्रांती घेतल्यानंतर संध्याकाळी ५ नंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला. त्यामुळं शहारतील काही भागांत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. तर, कार्यालयातून बाहेर पडलेल्या नोकरदारांची एकच तारांबळ उडाली आहे. परळ परिसरातील सखल भागात पाणी साचण्यासही सुरुवात झाली आहे. तर, काही ठिकाणी वाऱ्याच्या वेगानं झाडं पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तर, नागपूर आणि अहमदनगरमध्येही सकाळपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. दादर, हिंदमाता सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

वाचाः

पुढच्या दोन दिवसात मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर, मध्य महाराष्ट्र घाट भागात, कोकणात, गोवामध्ये मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. समुद्र किनारी ताशी ४० किमी वेगानं वारे वाहतील व समुद्र खवळलेला राहिल. त्यामुळं मच्छमारांना खोल समुद्रात न जाण्याचं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here