हैदराबाद: पतीनं पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्याची घटना हैदराबादमध्ये घडली आहे. पत्नी आणि मुलांना कात्रीनं भोसकल्यानंतर पतीनं आत्महत्या केली. चंदन नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पपीरेड्डी वसाहतीत हा प्रकार घडला.

ही घटना शुक्रवारी घडली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. सोमवारी सकाळच्या सुमारास घरातून दुर्गंध येऊ लागला. त्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी दरवाजा तोडला आणि घरात प्रवेश केला. त्यावेळी नागाराजू (४२) पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याची पत्नी सुजाथा (३६), मुलगा सिद्दाप्पा (११) आणि मुलगी रम्यश्री (७) यांचे मृतदेहही घरात आढळून आले.
चिता रचली, लेकाला झोपवले, फोटो काढले; वडिलांनी रचला लेकाच्या मृत्यूचा बनाव; कारण…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब मूळचं संगारेड्डीचं आहे. मात्र सात वर्षांपूर्वी उदरनिर्वाहासाठी संपूर्ण कुटुंब हैदराबादला आलं. सुजाथा घरातच टेलर म्हणून काम करायच्या. तर नागाराजू एका किराणा दुकानात काम करायचे. सुजाथा आणि दोन मुलांची हत्या करून नागाराजूनं आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घर आतून बंद होतं. त्यामुळे कोणीतरी बाहेरुन आत गेल्याची शक्यता नाही. नागाराजूनं तिघांना संपवून मग गळफास घेतला, अशी माहिती पोलिसांनी दिली. नागाराजू आणि सुजाथा यांच्यात वारंवार वाद व्हायचे, असं शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं. सुजाथाचे आधी प्रेमसंबंध होते. यावरून नागाराजू तिला त्रास द्यायचा. तिचा छळ करायचा.
VIDEO: दीड हजारांची उधारी परत केली नाही; तरुणाला स्कूटरला बांधलं, २ किलोमीटर पळवलं
सुजाथा टेलरिंगसाठी वापरत असलेल्या कात्रीचा वापर नागाराजूनं तिला आणि दोन मुलांना संपवण्यासाठी केला. यामुळे त्या तिघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात आलेली कात्री ताब्यात घेतली. तिन्ही मृतदेह सुजाथा यांच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here