हिंगोली : मराठवाड्यात परतीच्या पावसाने सगळीकडेच दाणादाण उडविली आहे. मागील सात दिवसांत ३४ मंडळात अतिवृष्टी झाली असून, सोमवारी सकाळपर्यंत १० मंडळात ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस नोंदविला गेला आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील शिल्लक पिकांचा चिखल होऊ लागला आहे. शेतकऱ्यांना दोन टप्प्यात शासनाने नुकसान भरपाई दिली असली तरी शेतीचे यंदा मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भाजीपाला पिकाला देखील या पावसाचा फटका बसल्याने भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत.

सध्या हिंगोलीसह मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यात पडत असलेल्या परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचा चिखल झालाच. मात्र, पालेभाज्या सुद्धा शेतात सडत आहेत. त्यामुळे शहरात येणाऱ्या पालेभाज्यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. अशा परिस्थितीतही परतीच्या पावसाने भिजलेल्या मेथीच्या जुडीला २० रुपयास तर वांगी, कारली ८० रुपये प्रति किलोवर तर मेथी थेट १००वर पोहोचली आहे. सदासुदीच्या काळात भाजीपाल्याचे दर कडाडल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहचते आहे. परंतु मिळत असलेल्या चांगल्या दरामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे.

सावधान! पुढच्या ३-४ आठवड्यात भारतावर मोठं संकट, तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे चिंता वाढली
सध्या शहरात जमीन भागातून येणारी भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. शेतातून भाजीपाला कसाबसा आणला जात आहे. परंतु, त्यास योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्याच्या पावसामुळे काही भाजीपाला काळवट दिसत आहे. याचबरोबर वातावरणातील बदलामुळे भाजीपाल्यावरील विविध रोग नियंत्रणात आणण्यासाठी महागड्या फवारण्याचा देखील शेतकऱ्यांना आर्थिक धोरण सहन करावा लागत आहे.

एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी सोडला अंधेरीचा गड, का केली तलवार म्यान? वाचा INSIDE STORY

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here