काय आहे नेमके प्रकरण?
भुसावळ नगरपालिकेच्या २०१६ च्या सार्वत्रिक निवडणूकीत भाजपच्या कमळ चिन्हावर लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, तत्कालीन नगरसेवक अमोल इंगळे (प्रभाग १ ब), लक्ष्मी रमेश मकासरे (प्रभाग १ अ), सविता रमेश मकासरे (प्रभाग २ अ), प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे (प्रभाग ६ ब), मेघा देवेंद्र वाणी (१० अ), अॅड.बोधराज दगडू चौधरी (९ ब), शोभा अरुण नेमाडे (२० अ), किरण भागवत कोलते (२२ ब) व शैलजा पुरुषोत्तम नारखेडे (प्रभाग १९ अ) हे निवडून आले. मात्र, त्यांनी २९ डिसेंबर रोजी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच १७ डिसेंबरला तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपातून बाहेर पडताना राजीनामा न दिल्याने भाजपच्या नगरसेविका पुष्पा बत्रा यांनी जिल्हाधिकार्यांकडे २९ डिसेंबर रोजी याचिका दाखल केली. याचिकेवर सुनावणी होवून या १० नगरसेवकांना जिल्हाधिकार्यांनी अपात्र ठरवले होते.
खंडपीठात दाद मागणार – एकनाथ खडसे
नगरविकास विभागाच्या निर्णयाविरोधात खंडपीठात दाद मागण्यात येईल, असं माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी बोलतांना सांगितले. हा निर्णय सरकारकडून अपेक्षितच होता त्यामुळे आधीच आम्ही अपिल केले होते, अशीही माहिती एकनाथ खडसे यांनी बोलतांना दिली आहे.