Corona Virus Mumbai: करोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रासह केरळमधील रुग्णसंख्या वाढली आहे. मुंबईत गेल्या तीन दिवसांत करोनाचे १५० हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या ५ दिवसांत सरासरी १० जणांना रुग्णालयात दाखल करावं लागत आहे. शुक्रवारी राज्यात करोनाचे ४७७ नवे रुग्ण आढळून आले. यातील १७८ रुग्ण मुंबईतील होते.


करोना रुग्णांची संख्येतील वाढ गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. जोपर्यंत कोणताही नवा व्हेरिएंट येत नाही, तोपर्यंत ओमिक्रॉन व्हेरिएंटची संक्रामकता कमी राहील, असं मुंबईत कोविड टास्क फोर्सचे सदस्य राहिलेल्या डॉ. राहुल पंडित यांनी सांगितलं. करोनामुळे घाबरण्याची गरज नाही. मात्र सावधान राहण्याची आवश्यकता आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालायला हवा. कुटुंबात कोणी आजारी असेल किंवा एखाद्याची रोगप्रतिकारशक्ती कमी असेल, तर त्यांनी मास्क लावावा, असा सल्ला पंडित यांनी दिला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.