मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसदर्भात मोठी मागणी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनचा चुकीचा सरकारी पायंडा मोडून पु्न्हा एकदा पोलिसांना एक पगार दिवाळी बोनस देण्यास सुरुवात करावी आणि पोलीस बांधवांची यंदाची दिवाळी गोड करावी, अशी मागणी अमित ठाकरे यांनी केली आहे. (amit thackeray has written a letter to fadnavis)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात अमित ठाकरे लिहितात, ‘महाराष्ट्रातील कायदा-सुव्यलस्थेची जबाबदारी राखण्यात आपले पोलीस बांधव दिवस-रात्र एक करतात. तुमच्या माझ्यासह राज्यातील सर्व नागरिक सणासुदीच्या दिवसांत सुट्टी घेऊन कुटुंबीय तसंच मित्रमंडळीसह जे काही आनंदाचे क्षण अनुभवतात, ते याच पोलिसांच्या अविरत सुरक्षा सेवेमुळे. अतिमहत्त्वाची शासकीय सेवा नोकरी म्हणून पोलीस बांधव ना युनियन करू शकतात, ना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना पाच दिवसांचा आठवडा नसतो, ना त्यांना पुरेशा सुट्ट्या मिळतात. कामाचे तास तर सर्वात जास्त; १२ ते १५ तास! पोलीस बांधवांच्याच म्हणण्यानुसार, इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना एका वर्षात तब्बल ७६ दिवस अतिरिक्त काम करावे लागते.

शेतकऱ्यांची दिवाळी धुमधडाक्यात साजरी झाली पाहिजे, राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र
हे सगळं आज सांगण्याचं कारण इतकंच की, पुढच्या आठवड्यात दिवाळी साजरी करताना आपल्या प्रत्येकाच्या घरात जेव्हा कंदील आणि पणत्या लागतील, तेव्हा पोलीस बांधव डोळ्यात तेल घालून गस्त देत असतील… फटाके वाजवताना कुठे कुणी लहान मुलगा भाजला तर त्याला रुग्णालयात दाखल करत असतील… पोलीस बांधव आपल्यापैकीच आहेत, त्यांच्या कुटुंबीयांनाही दिवाळी साजरी करावीशी वाटत असेल, हे एक समाज म्हणून आपण विसरूनच गेलोय, असे ठाकरे यांनी पुढे लिहिले आहे.

७५ हजार पदांच्या भरतीसंदर्भात मोठं पाऊल, शिंदेंनी ठाकरेंच्या काळातील निर्णय पुढं नेला
अमित ठाकरेंची आग्रहाची विनंती

गेल्या अनेक वर्षांपासूनचा चुकीचा सरकारी पायंडा मोडून पुन्हा एकदा पोलिसांना एक पगार दिवाळी बोनस देण्यास सुरुवात करावी अशी आग्रहाची विनंती अमित ठाकरे यांनी पत्राच्या शेवटी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना केली आहे. हा निर्णय घेऊन पोलीस बांधवांची दिवाळी गोड करावी असे आवाहन ठाकरे यांनी शेवटी केले आहे.

२६/११ च्या धर्तीवर मुंबईत तीन ठिकाणी पुन्हा बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here