औरंगाबाद : राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून परतीच्या पावसाने थैमान घातलं आहे. सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांचं तर मोठं नुकसान झालंच आहे अशात नदी-नाल्यांना पूर आल्याने नागरिकांचंही जनजीवन विस्कळीत झालं आहे. या सगळ्यात औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओदेखील समोर आला आहे.

कन्नड तालुक्यातील आमदाबाद इथे एका महिलेचे निधन झाले. नातेवाईकांसह ग्रामस्थांनी नदी पात्रातील उंच जागेवर अंत्यसंस्कार केले. परंतु, काही वेळातच नदीपात्रात पूर आला. पूराने पाण्याचा प्रवाह इतका वाढला की धगधगत्या चितेला पुराच्या पाण्याने वेढले. ही घटना कन्नड तालुक्यातील आमदाबाद येथे घडली.

Maharashtra Rain Alert : राज्यात ६ जिल्ह्यांवर अस्मानी संकट, ‘या’ तारखेपर्यंत यंदाचा मान्सून घेणार निरोप
गावांत स्मशानभूमि नसल्याने गावाशेजारील अंजना नदीच्या पात्रालगतच मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. चितेला भडाग्नी दिल्यानंतर काही वेळातच अंजना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. काही क्षणातच धगधगत्या चितेला पुराच्या पाण्याने वेढले. त्यामुळे नातेवाईकांची अस्वस्थता वाढली. मात्र, मोठ्या शर्थीने नातेवाईक व ग्रामस्थांनी प्रयत्न केल्याने अंत्यसंस्कार पार पडला.

भारतीयांनो सावध व्हा! नव्या संकटाची देशात एन्ट्री, यावर उपायही नाही; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here