mumbai police updates, मुंबई पोलिस दलातील ४० हजार पोलिसांना अखेर मोठा दिलासा; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय – 40000 cops of mumbai police force finally get a big relief an important decision of the state govt
मुंबई : मुंबई पोलिस दलातील सुमारे ४० हजार पोलिसांची अखेर प्रवासकोंडीतून सुटका झाली आहे. बेस्ट बसचा मोफत प्रवास बंद करण्यात आल्यानंतर प्रवासभत्ता सुरू करण्यासाठी आड येणारा जुन्या शासन आदेशात बदल करून राज्य शासनाने भत्ता देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे पोलिसांना पगारातून सुमारे २७०० रुपये प्रवास भत्ता मिळणार आहे. ऐन दिवाळीत मिळालेल्या मंजुरीमुळे पोलिस दलामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मुंबई पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. कर्तव्यावर हजर होताना, घरी जाताना किंवा अन्य काही कामासाठी बेस्टच्या बसमधून प्रवास करताना ओळखपत्र दाखविल्यास तिकीट काढावे लागत नव्हते. यासाठी पोलिस प्रशासनामार्फत बेस्टला दरवर्षी सुमारे आठ कोटी रुपये भरणा केला जात होता. मात्र १ जूनपासून मोफत प्रवासाची सुविधा बंद करण्याचा निर्णय तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी घेतला. मोफतप्रवास बंदचा निर्णय घेतानाच पोलिसांना पगारात सरसकट प्रतिमहिना २७०० रुपये प्रवास भत्ता देण्याची घोषणा करण्यात आली. यासाठी मुंबई पोलिसांच्या वतीने राज्य शासनाला पत्रव्यवहारही करण्यात आला. मात्र, प्रवासभत्ता सुरू करण्यास मंजुरी देण्यात १९९१मध्ये राज्य शासनाने घेतलेला शासन निर्णय अडसर ठरत होता. आमच्याकडे या, स्वस्तात जमिनी देऊ; महाराष्ट्रात येऊन शिवराजसिंहांकडून उद्योजकांना पायघड्या
या निर्णयानुसार मुंबईवगळता राज्यातील पोलिसांना प्रवासभत्ता सुरू करण्यात आला. मुंबईत पोलिसांना बेस्टने मोफत प्रवास करण्याची सुविधा याच निर्णयातून देण्यात आली आणि त्यामुळे प्रवास भत्त्याच्या लाभातून मुंबई पोलिसांना वगळण्यात आला. पुन्हा प्रवासभत्ता सुरू करण्यासाठी १९९१चा शासन निर्णय बदलावा किंवा रद्द करावा लागणार होता.
मोफत प्रवास बंद करून अनेक महिन्यानंतरही प्रवासभत्ता मिळत नसल्याचे वृत्त ‘मटा’ ने प्रसिद्ध केले होते. राज्य शासनाने गुरुवारी यांसंदर्भातील नवीन शासन निर्णय जारी करून १९९१चा जुना शासन निर्णय रद्द केला. यामध्ये प्रवास भत्ता देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये कर्तव्यापासून एक किलोमीटर अंतराच्या आत राहणाऱ्या पोलिसांना हा भत्ता मिळणार नाही. त्याचप्रमाणे काही कारणास्तव पोलिस गैरहजर राहिल्यास त्यांनाही या भत्त्यासाठी पात्र धरले जाणार नाही, असे यात नमूद करण्यात आले आहे.