दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी आपलं दु:ख मांडताना काही शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. ‘पावसामुळे हातात काहीच उरलं नाही. मोठा खर्च करून आम्ही पिकं आणली होती. पण सर्वच्या सर्व पिके पाण्याखाली गेली. आता आम्ही दिवाळी तरी कशी साजरी करायची?’ असा उद्विग्न सवाल यावेळी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी विचारला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, धीर सोडू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आता आपण रडायचं नाही लढायचं. तुम्ही तुमच्याकडे असलेला आसूड फक्त हातात घेऊ नका, तर तो वापराही, असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना करत सरकारला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.
Home Maharashtra bjp devendra fadanvis, शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी गेलेल्या उद्धव ठाकरेंचा शेतातूनच फडणवीसांवर घणाघात...
bjp devendra fadanvis, शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी गेलेल्या उद्धव ठाकरेंचा शेतातूनच फडणवीसांवर घणाघात – uddhav thackeray criticizes devendra fadnavis after going to aurangabad to interact with rain affected farmers
औरंगाबाद : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी आणि नुकसानीची पाहणी करण्यासाठी औरंगाबाद दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यावेळी उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात दहेगाव, पेंढापूर येथे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात पिकांची पाहणी केली. तसंच शेतकऱ्यांची कैफियत जाणून घेतली आणि त्यानंतर शेतातच पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.