टी. रवि शंकर म्हणतात…
– चलनामधील चढउतारावर नियंत्रण ठेवल्यास त्यामुळे व्यवसायाचा खर्च कमी होतो
– चलन स्थिर असल्यास व्यवसायवृद्धी होण्यास तसेच भारतीय उद्योग जागतिक स्तरावर वाढण्यासाठी मदत मिळते
– चलनाच्या दरातील लवचिकता कमी करण्यासाठी विदेशी चलन गंगाजळीचा उपयोग होतो
– गंगाजळीमुळे बाह्य स्तरावर देशाचे चलन स्थिर होते
– भारताकडे असलेली विदेशी चलन गंगाजळी ही चलनसाठ्यामुळे आलेली तसेच उसनवारीमुळे जमा झालेली आहे असे जगात सर्वसाधारणपणे म्हटले जाते
– बँका आणि कॉर्पोरेट्स बाह्यकर्जे घेतात आणि ती प्रगत अर्थव्यवस्थांकडून बाजारात आणल्या गेलेल्या सरकारी रोख्यांमध्ये गुंतवतात
– जागतिक वातावरणाचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होऊन तिला अचानक हादरा बसणे ही स्थिती विदेशी चलन गंगाजळीवरील अवलंबित्व कमी केल्यास होईल
– विदेशी चलनावर प्रमाणाबाहेर अवलंबित्व राहिल्यास देशात खेळत्या पैशावर नियंत्रण ठेवणे भाग पडते
– आपले चलन दबावाखाली असेल तर विदेशी गुंतवणूक देशाबाहेर जाण्याची शक्यता वाढते
रुपयाचे उपयोग वाढल्यास
– भारतीय उद्योगजगताची क्रयशक्ती वाढण्यास मदत मिळेल
– यामुळे भारतीय अर्थव्यवस्था सुदृढ होईल
– जगभरात रुपयाला सन्मान मिळून देशाची जागतिक प्रतिमा सुधारेल
– रुपयाचे महत्त्व वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने बाह्य व्यावसायिक कर्जे रुपयांमध्ये गेण्यास अनुमती दिली आहे, यासाठी बँकेने मसाला बॉण्डसारखी साधने विकसित केली आहेत
– मर्यादित वापरासाठी आयात व निर्यात रुपयामध्ये करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
“रुपया व अन्य देशांचे चलन यांत थेट व्यवहार करण्यासाठी अनेक देश आज उत्सुक आहेत. एशियन क्लिअरिंग युनियननेही याची दखल घेत व्यवहारपूर्तीसाठी प्रत्येक देशाचे स्थानिक चलन वापरता येते का याची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे प्रत्येक आयातदार देशाला त्याच्या स्थानिक चलनामध्ये बिले चुकती करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे,” – टी. रवी शंकर, डेप्युटी गव्हर्नर, रिझर्व्ह बँक.