Maharashtra Politics Diwali | प्रत्येक सण दणक्यात साजरा करायचा असा चंग बांधलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने ‘आनंदाचा शिधा’ योजनेसंदर्भात केलेली घोषणा लोकप्रिय ठरली होती. त्यामुळे रेशनिंगच्या साहित्यावर अवलंबून असणारी राज्यातील अनेक कुटुंबं ‘आनंदाचा शिधा’ कधी मिळणार याकडे डोळे लावून बसली होती. परंतु, दिवाळी सुरु होऊनही अद्याप अनेक रेशन दुकानांमध्ये आनंदाचा शिधा पोहोचलेलाच नाही. त्यामुळे लोकांना खुल्या बाजारातून चढ्या दराने फराळासाठीचे पदार्थ घ्यावे लागले.

हायलाइट्स:
- शिंदे सरकारच्या घोषणेचा फज्जा उडाला?
- दिवाळी सुरु होऊनही आनंदाचा शिधा मिळालाच नाही
प्रत्येक सण दणक्यात साजरा करायचा असा चंग बांधलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने ‘आनंदाचा शिधा’ योजनेसंदर्भात केलेली घोषणा लोकप्रिय ठरली होती. त्यामुळे रेशनिंगच्या साहित्यावर अवलंबून असणारी राज्यातील अनेक कुटुंबं ‘आनंदाचा शिधा’ कधी मिळणार याकडे डोळे लावून बसली होती. परंतु, दिवाळी सुरु होऊनही अद्याप अनेक रेशन दुकानांमध्ये आनंदाचा शिधा पोहोचलेलाच नाही. त्यामुळे लोकांना खुल्या बाजारातून चढ्या दराने फराळासाठीचे पदार्थ घ्यावे लागले. राज्यात काही ठिकाणी याचा काळाबाजार ही सुरु झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या आनंदाचा शिधा योजनेच्या अंमलबजावणीतील ढिसाळपणा आणि फोलपणा उघड झाला होता. त्यामुळे अनेक सामान्य नागरिकांना संताप व्यक्त केला होता.
केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कालच राज्य शासनाच्या योजनेच्या अंमलबजावणीतील कमतरतेवर बोट ठेवले होते. गरिबांच्या घरची दिवाळी गोड व्हावी यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेला आनंदाचा शिधा अजूनही आदिवासी भागात पोहोचला नसल्याची कबुली कपिल पाटील यांनी दिली होती. मुरबाडमध्ये आनंदाचा शिधा ३०० रुपयांत विकल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाची दखल राज्य सरकारने याची दखल घेतली आहे. या दुकानाचे लायसन्स रद्द करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.