सांगली : महाराष्ट्रातलं ग्रहण आणि देशाला लागलेलं ग्रहण महाराष्ट्राच्या मातीतून घालवण्याची आवश्यकता आहे. अशा शब्दात माजी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी भाजपावर टीका केली आहे. कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्र येथे “भारत जोडो” निमित्त आयोजित सभेमध्ये ते बोलत होते.

कडेगाव तालुक्यातल्या देवराष्ट्रे या ठिकाणी माजी कृषी राज्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधीच्या भारत जोडो रॅली निमित्ताने कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री सतेज पाटील, काँग्रेसचे नेते भाई जगताप यांच्या सह जिल्ह्यातल्या काँग्रेस नेत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. या निमित्ताने पार पडलेल्या सभेमध्ये विश्वजीत कदम बोलत होते.

Google कंपनीला एकाच महिन्यात दुसऱ्यांदा मोठा फटका, भरावा लागणार कोटींचा दंड
सूर्यग्रहणावरुन बोलताना कदम यांनी, “मला कोणीतरी सांगितलं की आज सूर्यग्रहण आहे. पण मी म्हणालो मला त्याची फिकीर नाही, कारण देशाला आणि महाराष्ट्राला लागलेलं ग्रहण हे आपल्या मातीतून घालवण्याची आवश्यकता आहे”. अशा शब्दात राज्यातल्या शिंदे फडणवीस सरकार आणि देशातल्या मोदी सरकारवर टीका केली आहे.

दिवाळीत धक्कादायक कृत्य! फटाके फोडण्यावरून आदल्या दिवशी वाद; दुसऱ्या दिवशी तरुणाचा खून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here