नवी दिल्लीः राजस्थानमधील सत्तासंघर्षाचा धग दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. या संघर्षाचा थेट उल्लेख करणं काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यांना पक्ष सोडायचा आहे त्यांनी खुशाल जावं. नव्या पिढीच्या तरुण नेत्यांसाठी दारं खुली आहेत, असं राहुल गांधी म्हणाले. एनएसयूआयच्या बैठकीत राहुल गांधी यांनी आपलं मत मांडलं आहे. सूत्रांच्या माहितीवरून एएनआय या संस्थेने हे वृत्त दिलं आहे.

राहुल गांधी यांनी आतापर्यंत राजस्थानमधील राजकीय सत्तासंघर्षावर थेट भाष्य केलेलं नाही. पण यांचं नाव न घेता राहुल गांधी यांनी त्यांना टोला लगावला आहे. ज्यांना पक्ष सोडून जायचा आहे त्यांनी खुशाल जावं. पक्षाचं दारं तुमच्या सारख्या तरुण नेत्यांसाठी खुली आहेत, असं राहुल गांधी एनएसयुआयच्या बैठकीत म्हणाले. दरम्यान, राहुल गांधी यांच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेलाय, असं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलंय.

राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी काँग्रेसमध्ये सत्तासंघर्ष सुरू आहे. यात काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर गंभीर आरोप केलेत. सचिन पायलट यांच्यासोबत काही काँग्रेसचे आमदारही आहेत. पायलट यांचे बंड मोडून काढण्यासाठी काँग्रेसने त्यांची राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून मंगळवारी हकालपट्टी केली. यासह पायलट यांचे समर्थक असलेल्या मंत्र्यांनाही पदावरून हटवलं आहे. या सर्व घडामोडींवर पायलट यांनी आज जाहीरपणे आपली भूमिका मांडली.

राहुल गांधींनी गळ घातल्याने उपमुख्यमंत्री झालोः सचिन पायलट

सचिन पायलट यांनी इंडिया टुडेला विशेष मुलाखत दिलीय. या मुलाखतीत सचिन पायलट यांनी राहुल गांधींसोबतच्या बहुचर्चित फोटोमागचं रहस्य उघड केलं आहे. आपल्याला उपमुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. हा निर्णय पूर्णपणे राहुल गांधी यांचा होता. राहुल गांधी यांनी गळ घातल्यानंतर आपण राजस्थानचे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास तयार झालो, असं पायलट यांनी सांगितलं. सत्तेचं आणि कामाचं समसमान वाटप करावं, असे निर्देश राहुल गांधी यांनी गहलोत यांना दिले होते. मात्र त्याऐवजी मुख्यमंत्री गहलोत यांनी आपल्याला बाजूला सारलं, अपमानीत केलं, असा गंभीर आरोप सचिन पायलट यांनी अशोक गहलोत यांच्यावर केला आहे. तर राजस्थान सरकार पाडण्यासाठी सचिन पायलट हे स्वतः सक्रिय होते. आमदारांच्या घोडेबाजाराचे तेच खरे सूत्रधार आहेत, असं उत्तर मुख्यमंत्री गहलोत यांनी सचिन पायलय यांच्या आरोपांना दिलंय.

पायलट यांनी परत यावं, काँग्रेसचे पुन्हा आवाहन

सचिन पायलट यांना भाजपमध्ये जायचं नाही, असं ते सांगत आहेत. मग त्यांनी भाजप नेत्यांशी सुरू असलेली चर्चा बंद करून राजस्थानमध्ये परत यावं. त्यांचं स्वागत आहे. त्यांचे जे काही मुद्दे आहेत ते चर्चेद्वारे सोडवले जातील, असं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here