भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) देखील गरकांना अशा संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. ट्विटरवर अनेकांनी असे मेसेज येत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. याबाबत बँकेने ग्राहकांना अशा कोणत्याही मेसेज किंवा कॉलला उत्तर न देण्याबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे. मेसेज किंवा फोन कॉलला उत्तर दिल्यास तुमची आर्थिक माहिती चोरीला जाण्याचा धोका असतो. वीज मंडळ किंवा पुरवठादार सहसा अधिकृत क्रमांकावरूनच एसएमएस पाठवतात म्हणूनच त्याची नेहमी तपासली पाहिजे.
अशा प्रकारच्या मेसेजमध्ये तुमचे वीज बिल थकले आहे. ते अद्यतनित करण्यासाठी दिलेल्या नंबरवर त्वरित कॉल करा, असे न केल्यास तुमचे वीज कनेक्शन खंडित केले जाईल. यासाठी ते तुम्हाला कोणत्याही नंबरवर कॉल किंवा मेसेज करण्यास सांगतात. असे केल्याने तुमची आर्थिक माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे तुम्ही ऑनलाइन फसवणुकीचे बळी ठरता.
अशा संदेशांपासून सावध रहा
अशा परिस्थितीत जर तुम्हाला असा कोणताही मेसेज आला तर सर्वप्रथम तो मेसेज व्हेरिफाईड आयडी किंवा कोणत्या मोबाईल नंबरवरून पाठवला गेला आहे हे तपासा. जर तो मेसेज एखाद्या नंबरवरून पाठवला असेल तर तो फेक आहे, त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. अशा मेसेजमध्ये दिलेल्या फोन नंबरवर कधीही संपर्क करू नका. तसेच तुमचे वैयक्तिक किंवा बँकिंग तपशील कोणाशीही शेअर करू नका. अन्यथा, यामुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. त्यामुळे या सर्व गोष्टींची काळजी घेणे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे.