last over India Vs Pakistan Match | कार्तिकनंतर आर. अश्विन फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. अखेरच्या चेंडूवर भारतीय संघाला विजयासाठी दोन धावा हव्या होत्या. त्यावेळी मोहम्मद नवाजने लेग स्टम्पव टाकलेला चेंडू अश्विनने अगोदरच अंदाज घेऊन सोडला होता. हा चेंडू वाईड ठरल्यामुळे भारताच्या धावसंख्येत एका धावेची भर पडून स्कोअर बरोबरीत आला होता.

 

R Ashwin
भारत-पाक मॅच

हायलाइट्स:

  • अश्विनने शेवटच्या षटकातील थरारक आठवण सांगितली
  • लेग स्टम्पवर टाकलेला चेंडू अश्विनने अगोदरच अंदाज घेऊन सोडला होता
मुंबई: ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील अत्यंत रंगतदार ठरलेल्या भारत-पाकिस्तान सामन्याला आता काही दिवस उलटले असले तरी अद्याप सोशल मीडियावर आणि क्रीडाप्रेमींमध्ये या हायव्होल्टेज मॅचची चर्चा सुरु आहे. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. सुरुवातीला पाकिस्तानच्या बाजूला असणारे विजयाचे पारडे अगदी शेवटच्या क्षणी भारताच्या बाजूला झुकले होते. या सगळ्यात भारताचा क्रिकेटपटू आर. अश्विनची भूमिका महत्त्वाची ठरली होती. शेवटच्या षटकात भारताला १६ धावांची गरज असताना हार्दिक पंड्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर दिनेश कार्तिकही रनआऊट झाला. कार्तिकनंतर आर. अश्विन फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. अखेरच्या चेंडूवर भारतीय संघाला विजयासाठी दोन धावा हव्या होत्या. त्यावेळी मोहम्मद नवाजने लेग स्टम्पवर टाकलेला चेंडू अश्विनने अगोदरच अंदाज घेऊन सोडला होता. हा चेंडू वाईड ठरल्यामुळे भारताच्या धावसंख्येत एका धावेची भर पडून स्कोअर बरोबरीत आला होता. मात्र, हे मैदानावर हे सगळे सुरु असताना आपल्यावर किती प्रचंड दबाव होता, याचा खुलासा आर.अश्विनने स्वत:च केला आहे.
अर्शदीप, सूर्या आणि राहुलवर भारी पडला अश्विन; एकही विकेट न घेता पाहा कसा काय ठरला हीरो
मी वाईड समजून सोडलेला तो चेंडू माझ्या पॅडला लागला असता किंवा मी पायचीत झालो असतो तर मी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असती, असे अश्विनने एका मुलाखतीदरम्यान हसतहसत सांगितले. मोहम्मद नवाजचा तो चेंडू माझ्या पॅडला लागून आपण हरलो असतो तर मी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन एक काम केले असते. ते म्हणजे मी ट्विट करून सांगितले असते की, खूप खूप धन्यवाद. मी माझ्या क्रिकेटच्या कारकिर्दीला विराम देत आहे. तुम्हा सगळ्यांचे खूप आभार. दिनेश कार्तिक बाद झाला तेव्हा मी त्याला दोष दिला होता. पण मॅच संपल्यानंतर कार्तिकने अश्विनचे आभार मानले होते.

अश्विनने शेवटच्या षटकातील थरारक अनुभवाविषयी सांगताना म्हटले की, ही मॅच पाकिस्तानच्या विरोधात होती. त्यांच्या जागी दुसरा कोणता संघ असता तर फरक पडला नसता. पण पाकिस्तानविरुद्ध पराभव झाल्यास भारतीय संघाला मोठ्या टीकेचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेवटच्या क्षणाला मी तणावात होतो, असा खुला अश्विनने केला.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here