सगळे जण एकत्र चहा प्यायले बसले. चहा प्यायल्यानंतर रविंद्र सिंह यांची प्रकृती अचानक बिघडली. ते बेशुद्ध होऊन पडले. कुटुंबीय त्यांना सावरणार इतक्यात शिवनंदन यांचा ६ वर्षांचा मुलगा शिवांग आणि ५ वर्षांचा मुलगा दिव्यांश यांचीही तब्येत बिघडली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल केलं.
रविंद्र सिंह, शिवांग आणि दिव्यांशला रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केलं. तर शिवनंदन आणि सोबरन सिंह यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना सैफईला हलवण्यात आलं. उपचारादरम्यान सोबरन यांचा मृत्यू झाला. यानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. चहा पावडरच्या जागी कीटकनाशक टाकल्यानं हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
चहा प्यायल्यानंतर घरातील सगळ्यांची तब्येत बिघडली. चहा तयार करताना महिलेनं चहा पावडरऐवजी कीटकनाशक टाकल्यानं हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी विषारी चहा आणि त्या चहात टाकलेले सर्व पदार्थ जप्त केले आहेत.