Maharashtra Projects landed in Gujrat | विरोधक केवळ टिका करणे व लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करण्यापलीकडे काहीच करत नाहीत असा आरोप सामंत यांनी केला. एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर आता शिळ्या कढीला उत आणण्यात अर्थ नाही, नाही, असेही उदय सामंत यांनी म्हटले. तत्कालीन सरकारने तेव्हा काहीच पावले उचलली नाहीत. त्यामुळे एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचा दावा उदय सामंत यांनी केला.

हायलाइट्स:
- वर्षभरापूर्वी सामंजस्य करार झाला
- सत्तेत असतानाही काही केले नाही
- तेच लोक युवा पिढीमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत
टाटा-एअरबस प्रकल्पाविषयी केंद्र सरकार व संबंधित यंत्रणा यांच्यात वर्षभरापूर्वी सामंजस्य करार झाला आहे. पण महाविकास आघाडी सरकारने यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. उद्योग मंत्रालयाकडून यासाठी कोणताही पाठपुरावा झालेला नाही. २१ सप्टेंबर २०२१ रोजीच या प्रकल्पासाठीचा सामंजस्य करार झाला होता. पण आता हेच काही विरोधक जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत आहेत, असा पलटवार सामंत यांनी केला.विरोधक केवळ टिका करणे व लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करण्यापलीकडे काहीच करत नाहीत असा आरोप सामंत यांनी केला. एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर आता शिळ्या कढीला उत आणण्यात अर्थ नाही, नाही, असेही उदय सामंत यांनी म्हटले.
वेदांता ग्रुपचा फॉस्कफॉन प्रकल्प यापूर्वीच गुजरातला गेल्यावर आता या प्रकल्पानंतर आता २२००० कोटी रुपयांचा टाटा एअर बसचा मोठा प्रकल्प आता गुजरात बडोदा येथे गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता आणखी एक मोठा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने रोजगाराची मोठी यावरून विरोधकांनी उद्योगमंत्री उदय सामंत याच्यावर निशाणा साधला आहे त्यावर उदय सामंत यांनी सामंत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. गेल्यावर्षीच हा प्रकल्प तिकडे गेला.
ज्यांनी सत्तेत असतानाही काही केले नाही, त्यांनी युवा पिढीमध्ये संभ्रम निर्माण करण्यात काही अर्थ नाही. वेदांता किंवा हाही प्रकल्प आमच्या सरकाच्या आधीच तिकडे गेले याचे पुरावेही आमच्या विभागाकडे आहेत.आम्ही युवा पिढीला बेरोजगारांना कोठेही वाऱ्यावर सोडणार नाही. हा आमचा प्राधान्यक्रम आहे. मुख्यमंत्री व आम्ही सांगितले आहे की, पुढच्या वर्षी या दोन प्रकल्पापेक्षाही मोठा प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणला जाईल. ही ग्वाही उद्योग मंत्री म्हणून आपण देतो, असे उदय सामंत यांनी म्हटले.
राज्य सरकारचे इंजिन फेल आहे : आदित्य ठाकरे
आम्ही या सरकारला अनेकदा सांगतो होतो की या एअर बस प्रकल्प निघून जाईल. मात्र, आमचं म्हणणं घटनाबाह्य सरकारने हे ऐकले नाही आणि आज महाराष्ट्राला पुन्हा एका धक्का बसला. माझा एकच प्रश्न आहे सरकारला की महाराष्ट्रात हुशार तरुण बेरोजगार नाहीत का? आणि असे मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून का निघून गेले याचे उत्तर मिळणार आहे का? गद्दार सरकार आल्यानंर हा चौथा मोठा प्रकल्प आहे जो, महाराष्ट्रातून निघून गेला आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
आमचं देखील डबल इंजिनच सरकार होतं तेव्हा दाव्होसमध्ये ८० हजार कोटी आणि कोविडच्या काळात साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणली. आता राज्य सरकारचे जे इंजिन आहे ते फेल इंजिन आहे. केंद्र सरकारच इंजिन जरी चालू असल तरी राज्य सरकारच इंजिन हे फेल इंजिन असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.