अमरावती : ‘आमच्या येथे ईश्वर कृपेने व आमचे गुरू श्री. जमीलउल्ला शाहा बाबा यांच्या आशीर्वादाने मंगल कार्य करण्याचे योजिले आहे…’, हा मजकूर आहे विवाहपत्रिकेतील आणि तो ही दोन मुस्लीम बहिणींच्या पत्रिकेतील. या दोन्ही बहिणींचा विवाह येत्या ३० ऑक्टोबर रोजी वलगाव येथे आयोजित आहे. विशेष म्हणजे, या विवाह पत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज आणि योद्धा टिपू सुलतान यांनी अनुक्रमे मुस्लीम आणि हिंदू धार्मिक स्थळांबद्दल दाखविलेल्या उदारतेविषयी माहिती नमूद आहे. आहे. त्यामुळे या पत्रिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वलगाव येथील ‘हिंदू मुस्लीम कौमी एकता मंच’ चे कार्यकर्ते अनिसभाई अहेमद मिर्झा यांच्या सायमा नाज व अदिबा सानिया या दोन मुली आहेत. त्यांच्या विवाहाच्या निमित्ताने दोन्ही शूरवीर राजांच्या धार्मिक दृष्टिकोनाबाबतची माहिती समाजबांधवांना कळावी, या अनुषंगाने ही पत्रिका तयार करण्यात आली. टिपू सुलतान यांनी १५६ मंदिरांना जमीन दान दिली, तर काशीच्या मंदिरात १० हजार सोन्याचे शिक्के दान दिले होते. त्याचप्रमाणे गुरू याकूब शाहा यांच्या दर्ग्यासाठी शिवाजी महाराजांनी १०० एकर जमीन दान दिली होती. तसेच रायगडावर जगदीश्वराच्या मंदिरासोबतच मशीदही बांधली असल्याचे त्या पत्रिकेत नमूद केले आहे.

वाचा- पावसाची जोरदार बॅटींग; भारत-आफ्रिका मॅच होणार का? असे आहे पर्थचे हवामान

Marriage card

वाचा-PAK vs ZIM: पाकिस्तानचा संघ क्वॉलिफाय झाला; झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यानंतर पाहा काय झालं

सध्याच्या काळात धार्मिक तेढ वाढले असताना, या दोन धर्मातील अंतर कमी व्हावे, यासाठी अनिस भाईंची ही कृती म्हणजे त्यांच्या वैचारिक प्रगल्भतेची साक्षच आहे. दरम्यान, ‘बदनमें दौड़ता सारा लहू इमानवाला है, मगर जालीम समझता है की पाकिस्तानवाला है’. मुनव्वर राणा यांचा हा शेर अनिसभाई मिर्झा यांना तंतोतंत लागू पडतो, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

वाचा- टी-२० वर्ल्डकपच्या ११व्या दिवशी निश्चित झाला विजेता; आशिया खंडातील हा संघ होणार चॅम्पियन, पाहा झालं तरी काय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here