
भारत हरल्यास काय?
थोड्याच वेळात भारत वि. दक्षिण आफ्रिका सुरू होईल. यामध्ये भारत पराभूत झाल्यास दक्षिण आफ्रिकेचा संघ गट २ मध्ये पहिल्या स्थानावर जाईल आणि भारत पहिल्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरेल. अशा परिस्थितीत भारताची उपांत्य फेरीची शर्यत कठीण होईल. दक्षिण आफ्रिकेनंतर भारताचा सामना बांग्लादेश आणि झिम्बाब्वेशी होणार आहे.
गुणांचं गणित काय सांगतं?
भारत दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाल्यास भारताचे ३ सामन्यांत २ विजय, एका पराजयासह ४ गुण होतील. उर्वरित दोन सामने जिंकल्यास भारताचे ८ गुण होतील आणि भारत उपांत्य फेरीत पोहोचेल. मात्र या दोनपैकी एक सामना गमावल्यास भारताची उपांत्य फेरीची वाट खडतर असेल. कारण या स्पर्धेत मोठे उलटफेर पाहायला मिळाले आहेत.
बांग्लादेशचे अद्याप २ सामने शिल्लक आहेत. त्यांना भारत आणि पाकिस्तानचा सामना करायचा आहे. दोन्ही सामने जिंकल्यास बांग्लादेश उपांत्य फेरी गाठेल. मात्र एक सामना गमावल्यास बांग्लादेशचे ६ गुण होतील आणि मग सगळा खेळ नेट रनरेटवर अवलंबून असेल.