cordelia cruises drug party | ज्ञानेश्वर सिंह यांनी समीर वानखेडे यांच्या कारवाईतील अनेक त्रुटी समोर आणल्या होत्या. ज्ञानेश्वर सिंह महाराष्ट्र आणि गोव्याचे NCB DDG होते. मात्र, आता त्यांची भरती उत्तर भारतात करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर सिंह यांच्याकडे आता जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात, चंदीगढ, लडाख, मध्यप्रदेश, राजस्थान, दीव-दमण आणि दादरा नगर हवेली येथील जबाबदारी असेल.

 

Aryan Khan case
आर्यन खान ड्रग्ज केस

हायलाइट्स:

  • आर्यन खानला क्लीनचिट देण्यात आली होती
  • ज्ञानेश्वर सिंह यांनी समीर वानखेडे यांच्या कारवाईतील अनेक त्रुटी समोर आणल्या होत्या.
मुंबई: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील एनसीबीच्या (अमली पदार्थ नियंत्रण कक्ष) तपासातील त्रुटी उघड करणारे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांची बदली करण्यात आली आहे. एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी कॉर्डिलिया क्रुझवरील कारवाईत आर्यन खानला अटक केली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र, नंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ही सगळी कारवाई म्हणजे पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप केला. त्यामुळे एनसीबीच्या विशेषत: समीर वानखेडे यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. यानंतर एनसीबीकडून या प्रकरणाचा अंतर्गत तपास ज्ञानेश्वर सिंह यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्यावेळी ज्ञानेश्वर सिंह यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाने केलेल्या कारवाईची चौकशी केली होती. या चौकशीअंती ज्ञानेश्वर सिंह यांनी समीर वानखेडे यांच्या कारवाईतील अनेक त्रुटी समोर आणल्या होत्या. परिणामी नंतरच्या काळात एनसीबीकडून आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात क्लीनचिट देण्यात आली होती. ज्ञानेश्वर सिंह यांच्या अहवालामुळे एकप्रकारे आर्यन खानचे निर्दोषत्त्व सिद्ध होण्यास मदत झाली होती.
Sameer Wankhede NCB Probe वानखेडेंवरील खंडणीचा आरोप: NCBला मुंबई पोलिसांकडून हवी ‘ही’ मदत
ज्ञानेश्वर सिंह महाराष्ट्र आणि गोव्याचे NCB DDG होते. मात्र, आता त्यांची भरती उत्तर भारतात करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर सिंह यांच्याकडे आता जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात, चंदीगढ, लडाख, मध्यप्रदेश, राजस्थान, दीव-दमण आणि दादरा नगर हवेली येथील जबाबदारी असेल. ज्ञानेश्वर सिंह यांनी आपल्या अहवालात समीर वानखेडे आणि एनसीबीच्या पथकाने आर्यन खान प्रकरणात नियमांचे पालन न केल्याची टिप्पणी केली होती. नंतरच्या काळात समीर वानखेडे यांनी सर्वोच्च न्यायालयात ज्ञानेश्वर सिंह यांनी आपल्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याची तक्रार केली होती. मात्र, या सगळ्या प्रकरणानंतर समीर वानखेडे यांची एनसीबीच्या विभागीय संचालकपदावरुन गच्छंती झाली होती. त्यांनी पु्न्हा भारतीय महसूल खात्यात पाठवण्यात आले होते. दरम्यान, ज्ञानेश्वर सिंह यांच्यानंतर महाराष्ट्र आणि गोव्याचे NCB DDG म्हणून सचिन जैन काम पाहतील.
Mumbai Rave Party: ‘त्या’ रात्री गोसावी व भानुशाली NCB कार्यालयात परत आले होते!; मलिक यांनी दिला पुरावा

आर्यन खानला क्लिनचिट

कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला क्लीनचिट देण्यात आली होती. एनसीबीकडून न्यायालयात सादर करण्यात आलेल्या सहा हजार पानी आरोपपत्रात आर्यन खानवर कोणताही ठपका ठेवण्यात आला नव्हता. या सगळ्यानंतर समीर वानखेडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला होता.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here