नांदेड : जिल्ह्यातील बोधडी येथील भाविक तेलंगणातील आडेली देवीच्या दर्शनासाठी जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात किनवट तालुक्यातील शिवणीपासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या झळकवाडी गावाजवळील घाटात आज सकाळी १० वाजताच्या सुमारास झाला.

या अपघातात बालाजी पांडुरंग खोकले (१९) आणि नागेश रामा टारपे (२०) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तसंच दोघे गंभीर जखमी झाले आणि काही जण किरकोळ जखमी असून त्यांना शिवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. रिक्षाचालक गणेश गवळे, सुनील रामा टारपे, विशाल चंद्रकांत टारपे, विजय सुरेश टारपे, शंकर डुकरे, वसंत डुकरे, मारुती बोंबले या जखमींवर उपचार करण्यात आले व नंतर हिमायतनगर येथे हलवण्यात आलं आहे.

साताऱ्याचा सुपुत्र गावातील शेतात रमला! मुख्यमंत्री शिंदेंनी स्वत: केली शेतीची मशागत

दरम्यान, या घटनेची माहिती कळताच इस्लापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भारत सावंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ए.एस. शेख आणि संदीप साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here