रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हयात खेडजवळ भोस्ते घाटात एलपीजीने भरलेला टँकर उलटल्याने मुंबई-गोवा महामार्गवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास तुर्तास हळूहळू एकदिशामार्गाने सुरू करण्यात आली आहे. जयगड येथील टीम दोन तासात घटनास्थळी दाखल होईल व कोल्हापूर येथील तज्ज्ञांच्या टीमला पोहोचण्यास रात्री उशीर होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर निर्णय घेऊन गॅस टँकर रिकामा करण्याचा निर्णय होईल व वाहतूक दोन तासांनी पुन्हा थांबवली जाणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गेले जवळपास तीन ते चार तास या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद होती. (The overturned LPG tanker on the Mumbai-Goa highway has affected traffic)

खेड जवळ भोस्ते घाटात एलपीजी ज्वालाग्राही रसायन वाहतूक करणारा टँकर संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वळणावर उलटल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. लोटे येथील घरडा केमिकल व विनती ऑर्गनिक या कंपन्यांच्या टीमला खेड पोलिसांनी घटनास्थळी पाचारण केले होते. या टीमला तूर्तास टँकरमधील ज्वलनशील गॅस लिकेज थांबवण्यात यश आले आहे.

दरम्यान, कोल्हापूर व रत्नागिरी जयगड येथून टीमला पाचारण करण्यात आले आहे. पलटलेल्या टँकरमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात गॅस आहे. त्यामुळे कोल्हापूर जयगड येथीक टिम घटनास्थळी दाखल झाल्यावर महामार्गावरील वाहतूक पुन्हा थांबवण्यात येण्याची शक्यता आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी शशीकिरण काशीद, पोलीस निरीक्षक निशा जाधव, सहाय्यक निरीक्षक सुजीत गडदे व पोलीस कर्मचारी पथक व खेड तालुका प्रशासन खेड येथील मदत ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित आहेत.

भास्कर जाधव यांच्या अडचणी वाढणार?; या कारणामुळे कुडाळ पोलिसांनी बजावली नोटीस
आज मंगळवारी १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजण्याच्या सुमारास भोस्ते घाटातील अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर उलटला व मोठी गंभीर घटना घडली. कंटेनरमधील रसायन गळती सुरू झाल्याने या मार्गावरील वाहतूक तात्काळ ठप्प झाली. घटनास्थळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, वायू गळती मुळे या मार्गावरील वाहतूक अन्यत्र वळविण्यात आली होती.

रत्नागिरीत हळहळ! कोकण रेल्वेतून पडल्याने प्रवाशाचा जागीच मृत्यू; ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू
घाटातील मुंबईच्या व गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक शिव लवेल मार्गेही वळवण्यात आली. घाटात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अथक प्रयत्नानंतर रात्री उशिरा साडेआठ वाजण्याच्या सुमारास एक लाईन सुरू करण्यात आली आहे. टँकरमधील वायू गळती होत असल्याने या टँकर परिसरात पाचशे मीटर परिसरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. बंदोबस्त तैनात ठेवून खबरदारी घेत एकदिशा मार्ग सुरू ठेवण्यात आला आहे. या अपघातामुळे सायंकाळी मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

साहिल मोरे प्रकरणात मैत्रिणीवर गुन्हा दाखल; टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त केल्याचा ठपका
दरम्यान, उलटलेला टॅंकर हा रत्नागिरी जयगड येथून मुंबईच्या दिशेने निघाला होता यावेळी हा अवघड वळणावर हा दुर्देवी अपघात झाला त्याचा परिणाम मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here