करोना संक्रमणादरम्यान भारतात उपस्थित असलेल्या या परदेशी तबलिघी जमातीच्या आरोपींनी कोर्टासमोर आपली चूक कबूल केली. आपल्याकडून करोना नियमांची अवहेलना झाल्याचं त्यांनी मान्य केलं. इतकंच नाही तर परदेशी कायदा, डिझास्टर मॅनेजमेंट कायदा आणि आयपीसीच्या अनेक कलमांचाही आपल्याकडून भंग झाल्याचं त्यांनी मान्य केलं. हे सर्व जण चीन, नेपाळ, इंडोनेशिया, फिजी आणि इतर देशांतून दिल्लीतील मरकझमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आले होते.
यापूर्वी, साकेत कोर्टानं बुधवारी ९१ तबलिघी जमातीशी संबंधित परदेशी आरोपींना जामीन मंजूर केला होता. या सर्वांनी दिल्लीतील निझामुद्दीन मरकझमध्ये तबलिघी जमातीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. न्यायालयानं या सर्वांना १०-१० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. तसंच त्यापूर्वी साकेत कोर्टानं मंगळवारी याच प्रकरणाशी निगडीत १२५ परदेशी नागरिकांना जामीन दिला होता.
वाचा :
वाचा :
दिल्ली पोलिसांनी मरकझ प्रकरणातील ९०० हून अधिक परदेशी नागरिकांवर गुन्हा दाखल केलाय. त्यांच्यावर व्हिजा नियमांच्या उल्लंघनासोबतच करोना संक्रमणादरम्यान बेजबाबदारपणे वर्तवणुकीचा आरोप करण्यात आलाय. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, व्हिजा निय आणि करोना दिशा-निर्देश धुडकावून लावत हे सर्व परदेशी नागरिक दिल्लीतील जमातीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
मार्च महिन्यात तबलीघी जमातच्या आंतरराष्ट्रीय मुख्यालय दिल्ली स्थित निझामुद्दीन मरकजमध्ये ६७ देशांतील २०४१ तबलिघी सहभागी झाले होते. यामध्ये ९१६ जणांना दिल्ली पोलिसांनी मरकझमधून काढून क्वारंटाईन सेंटर आणि रुग्णालयात दाखल केलं होतं. काही परदेशी तबलिघी त्यापूर्वीच देशातील वेगवेगळ्या भागांत दाखल झाले होते. तिथं संबंधित राज्य पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली. उत्तर प्रदेशातही काही परदेशी तबलिघी जमातीच्या सदस्यांवर चार्जशीट दाखल करण्यात आलीय. दिल्लीत मोठ्या प्रमाणात परदेशी तबलिघी करोना पॉझिटिव्ह आढळले होते. उपचारानंतर त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं होतं.
वाचा :
वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times