मुंबईः गेल्या चार महिन्यांपासून करोना साथीने महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. आज दिवसभरात ८ हजार ६४१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून २६६ जणांचा जीव गमावला आहे. आत्तापर्यंतचा हा सर्वाधिक आकडा आहे. गेल्या २४ तासांत करोनाच्या साथीनं ८ हजारांहून अधिक बळी घेतला असून एकूण मृतांचा आकडा ११ हजार १९४वर पोहोचला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. (Coronavirus in )

वाचाः

राज्यात करोना रुग्णांचे वाढते प्रमाण व मृतांच्या संख्येत होणारी वाढ यामुळं आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे. राज्यात सध्या ३. ९४ टक्के इतका मृत्यूदर आहे. २४ तासांत करोनाने २६६ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. राज्यात आज ८६४१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २ लाख ८४ हजार २८१ इतकी झाली आहे. आतापर्यंत राज्यात १४ लाख ४६ हजार ३८६ इतक्या करोना चाचणी झाल्या असून त्यातील १९.६५ टक्के रुग्ण करोना पॉझिटिव्ह निघाले तर बाकी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

वाचाः

राज्यात करोनावर यशस्वीपणे मात करुन घरी परतलेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. आज तब्बल ५ हजार ५२७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. राज्याचा रिकव्हरी रेटही ५५. ६३ इतका आहे. तर आत्तापर्यंत एकूण १ लाख ५८ हजार १४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसंच. विविध रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या १ लाख १४ हजार ६४८ इतकी आहे. राज्यात सध्या ७ लाख १० हजार ३९४ जण होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ४२ हजार ८३३ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये असल्याचेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here