t20 world cup: टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतानं बांगलादेशचा थरारक लढतीत पराभव केला. त्यामुळे भारताचं उपांत्य फेरीचं तिकीट जवळपास निश्चित झालं आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत भारतानं बांगलादेशला ५ धावांनी नमवलं. पावसानं व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारतानं बाजी मारली.

नुरुल हसन नॉन स्ट्राईकरला असताना वारंवार गोलंदाजाआधी क्रिझ सोडत होता. ही बाब भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या लक्षात आली. हसनची कृती पाहून रोहित संतापला. त्यानं रोहितनं हसनला तातडीनं इशारा दिला. बाहेर निघालास तर स्टम्प उडवेन, असा थेट इशारा रोहितनं हसनला दिला.
हसन मैदानावर आल्यानंतर बांगलादेशनं आणखी दोन फलंदाज सहा चेंडूंत गमावले. यानंतर हसननं गोलंदाज तस्किन अहमदच्या साथीनं भारताला झुंज दिली. ६ बाद १०८ अशा परिस्थितीतून दोघांनी फटकेबाजी सुरू केली. बांगलादेशला ३ षटकांत ४३ धावांची गरज होती. हसन आणि तस्कननं प्रयत्नांची शर्थ केली. मात्र भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा केला आणि ५ धावांनी सामना जिंकला.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.