Tata sons former chairman | ५४ दिवस रुग्णालयात, जबड्याची सर्जरी; घरी परतल्यानंतर पोलिसांसमोर सांगितला सायर मिस्त्रींच्या अपघाताचा थरारक प्रसंग. पोलीस अनाहिता पडोले यांचाही जबाब नोंदवणार आहेत. पोलीस दारिसय पंडोले यांचा जबाब नोंदवायला गेले तेव्हा त्यांना बराच वेळ लागला. कारण अपघातावेळी नेमके काय घडले, हे आठवण्यासाठी दारियस पंडोले यांना वेळ लागत होता. मात्र, सद्यस्थिती पाहता अनाहिता पंडोले यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळेच हा अपघात घडल्याचे दिसत आहे.

 

Cyrus Mistry Accident
सायरस मिस्त्री अपघात

हायलाइट्स:

  • अनाहिता पंडोले या तिसऱ्या लेनमधून कार चालवत होत्या
  • सूर्या नदीवरील पूलानजीक रस्ता निमुळता होता
मुंबई: टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा सप्टेंबर महिन्यात पालघरनजीक झालेल्या भीषण अपघातामध्ये मृत्यू झाला होता. चारोटी गावाच्या परिसरात सूर्या नदीवरील पूलावर सायरस मिस्त्री यांची मर्सिडीज कार जोरात दुभाजकावर जाऊन आदळली. यामध्ये सायरस मिस्त्री जागीच गतप्राण झाले होते. हा अपघात घडला तेव्हा मर्सिडीज कारमध्ये एकूण चारजण होते. यापैकी सायरस मिस्त्री आणि जहांगीर दिनशा पंडोले यांचा मृत्यू झाला होता. तर दारियस पंडोले आणि डॉ. अनाहिता पंडोले यांना गंभीर दुखापत झाली होती. अनेक दिवसांच्या उपचारानंतर दारिसय पंडोले यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यानंतर पोलिसांनी दारियस पंडोले यांचा जबाब नोंदवला असून त्यामधून सायरस मिस्त्री यांचा अपघात नेमका कसा घडला, याबद्दल काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

दारियस पंडोले यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, त्यांची पत्नी गायनॉकॉलॉजिस्ट डॉ. अनाहिता पंडोले या रस्त्यावरील तिसऱ्या लेनमधून मर्सिडीज कार चालवत होत्या. सूर्या नदीवरील पुलावरील रस्ता अरुंद असल्याने त्यांनी गाडी तिसऱ्या लेनमधून दुसऱ्या लेनमध्ये टाकली पाहिजे होती. परंतु, अनाहिता पंडोले यांनी वेळेत गाडी दुसऱ्या लेनमध्ये न नेल्याने सायरस मिस्त्री यांची कार दुभाजकावर आदळली, अशी माहिती दारियस पंडोले यांनी पोलिसांना दिली.
Cyrus Mistry: सायरस मिस्त्रींचा अपघात झाला ‘तो’ हायवेचा टप्पाच खतरनाक! एका वर्षात ‘इतक्या’ जणांचा मृत्यू
पोलिसांनी मंगळवारी दारिसय पंडोले यांच्या दक्षिण मुंबईतील घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवला होता. गेल्याच आठवड्यात दारिसय पंडोले यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. आता पोलीस अनाहिता पडोले यांचाही जबाब नोंदवणार आहेत. पोलीस दारिसय पंडोले यांचा जबाब नोंदवायला गेले तेव्हा त्यांना बराच वेळ लागला. कारण अपघातावेळी नेमके काय घडले, हे आठवण्यासाठी दारियस पंडोले यांना वेळ लागत होता. मात्र, सद्यस्थिती पाहता अनाहिता पंडोले यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळेच हा अपघात घडल्याचे दिसत आहे. मात्र, पोलिसांनी मर्सिडीज कंपनीकडून याबाबतचा अहवाल मागवला आहे. त्यानंतर पोलीस अनाहित पंडोले यांच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवण्याचा गुन्हा नोंदवायला की नाही, याबाबत निर्णय घेतील.

नेमकं काय घडलं?

दारियस पंडोले यांनी दिलेल्या जबाबानुसार, अनाहिता पंडोले या तिसऱ्या लेनमधून कार चालवत होत्या. सूर्या नदीवरील पूलानजीक रस्ता निमुळता होता. त्यामुळे अनाहिता पंडोले यांनी गाडी दुसऱ्या लेनमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यापुढे एक कार असल्याने अनाहिता पंडोले यांना मर्सिडीज कार दुसऱ्या लेनमध्ये नेता आली नाही आणि त्यांची कार दुभाजकाला जाऊन धडकली.
कार अपघातानंतर कुठे इजा झाली? मिस्त्रींच्या मृत्यूचं कारण काय?; पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला
या अपघातामध्ये दारियस पंडोले आणि अनाहिता पंडोले यांना भीषण दुखापत झाली होती. दारिसय पंडोले यांच्यावर तब्बल ५४ दिवस रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांचा चेहरा आणि हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दारियस यांचा जबडा, तोंड आणि चेहऱ्यावर अनेक जखमा झाल्या होत्या. संसर्ग झाल्यामुळे त्यांची प्रकृती काही काळ गंभीर होती. तर अनाहिता पंडोले यांचे नाक, बरगडी, फुफ्फुस आणि कमरेखालच्या भागाला गंभीर दुखापत झाली होती.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here