Maharashtra Politics | मुंबईत झालेल्या स्वागतासाठी मी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो. मुंबई हे भारतातील प्रमुख शहर आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. दोन वर्षांपेक्षा अधिक काळ मुंबई आणि राज्याला ग्रहण लागले होते. मात्र, आता हे ग्रहण सुटले आहे. आज मोदीजी आणि शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्राचा विकास वेगाने होत आहे, असा दावा तेजस्वी सूर्या (Tejasvi Surya) यांनी केला.

 

Aaditya Thackeray
आदित्य ठाकरे

हायलाइट्स:

  • महाराष्ट्राला लागलेले ग्रहण सुटले आहे
  • भाजपचा राष्ट्रीय पातळीवरील ग्लॅमरस युवा चेहरा असलेला खासदार
मुंबई: गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यभरात अनेक दौरे करुन आणि सातत्याने पत्रकार परिषदा घेऊन शिंदे-फडणवीस सरकारवर हल्ला चढवणारे आदित्य ठाकरे यांची गणना एव्हाना महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांमध्ये होऊ लागली आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असेपर्यंत आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघ आणि मुंबईत अधिक लक्ष घालताना दिसत होते. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी महाराष्ट्र बऱ्यापैकी पिंजून काढला आहे. तसेच गेल्या काही काळात आदित्य ठाकरे हे एखाद्या कसलेल्या नेत्याप्रमाणे भाजप आणि शिंदे गटाच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. या सगळ्यामुळे साहजिकच वरळी मतदारसंघ आणि राज्यभरात आदित्य ठाकरे यांचा दबदबा थोडा का होईना, नक्कीच वाढला आहे. त्यामुळे राज्यातील आघाडीच्या तरुण नेत्यांमध्ये आदित्य ठाकरे यांचा वरचा क्रमांक लागतो. आदित्य ठाकरे यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी भाजपने वरळी मतदारसंघात मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपचा राष्ट्रीय पातळीवरील ग्लॅमरस युवा चेहरा असलेले खासदार आणि भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या (Tejasvi Surya) हे मुंबईत आले आहेत.
मुख्यमंत्री माझ्यासमोर बसून चर्चा करतील का? आदित्य ठाकरेंच्या ट्विटरवर १५ हजार लोक म्हणाले….
खासदार तेजस्वी सूर्या हे आज आदित्य ठाकरे यांच्या वरळीत मतदारसंघात जाणार आहेत. याठिकाणी तेजस्वी सूर्या यांच्या हस्ते भाजपच्या युवा योद्धा शाखेचे उद्घाटन केले जाईल. त्यामुळे आज वरळीत भाजप युवा मोर्चाकडून मोठ्याप्रमाणावर शक्तीप्रदर्शन पाहायला मिळेल. तेजस्वी सूर्या यांचे मुंबईत आगमन झाल्यानंतर भाजप युवा मोर्चाकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
माझी मजा उडवा ठीकेय, पण… सत्तारांनी ‘पप्पू’ हिणवल्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
यावेळी तेजस्वी सूर्या यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुंबईत झालेल्या स्वागतासाठी मी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो. मुंबई हे भारतातील प्रमुख शहर आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. दोन वर्षांपेक्षा अधिक काळ मुंबई आणि राज्याला ग्रहण लागले होते. मात्र, आता हे ग्रहण सुटले आहे. आज मोदीजी आणि शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्राचा विकास वेगाने होत आहे. पंतप्रधान मोदींचं सबका साथ, सबका विकास हे धोरण पुढे नेण्यासाठी आणि भाजपच्या युवा मोर्चाला बळकटी देण्यासाठी मी वरळीत आलो आहे, असे तेजस्वी सूर्या यांनी म्हटले. त्यामुळे आता आगामी काळात मुंबईत भाजप युवा मोर्चा आणि युवासेनेत राजकीय द्वंद्व रंगण्याची शक्यता आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here