Authored by prasad lad | Maharashtra Times | Updated: 4 Nov 2022, 6:35 pm

T 20 World Cup : झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात पाऊस पडला तरी चालेल, पण ही एक गोष्ट घडली तर भारताचा खेळ खल्लास होऊ शकतो असे आता समोर आले आहे. टी – २० विश्वचषकाचे समीकरण हे आता समोर आले आहे. या लढतीत पाऊस पडला तर काय होऊ शकते हे देखील आता स्पष्ट झाले आहे, सेमी फायनलचे समीकरण काय आहे जाणून घ्या…

 

IND v ZIM
सौजन्य-ट्विटर
मेलबर्न : भारतासाठी आता झिम्बाब्वेचा सामना करो या मरो असा असेल. कारण त्यांना जर टी-२० विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना हा सामना जिंकावा लागेल. कारण हा सामना पराभूत झाल्यावर भारताचे टी-२० विश्वचषकातील आव्हान संपुष्टात येऊ शकते. पण या सामन्यात एकवेळ पाऊस पडला तरी चालेल पण एक गोष्ट मात्र घडली तरी भारताचे आव्हान संपुष्टात येऊ शकते.

टी-२० विश्वचषकातील समीकरण बदलत आहे. भारतीय संघ सध्या त्यांच्या गटात ६ गुणांसह अव्वल स्थानावर असून रविवारी होणारा हा सामना भारतीय संघाच्या उपांत्य फेरीतील सामन्याचे भवितव्य ठरवेल. सध्यस्थितीत नेट रनरेटच्या बाबतीत पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ भारताच्या पुढे आहेत. पण जर पाऊस पडला तर भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण मिळेल. सध्याच्या घडीला भारताचे सहा गुण आहेत आणि त्यांना एक गुण मिळाला तर त्यांचे सात गुण होतील. पण त्यामुळे पाकिस्तान या स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो. कारण पाकिस्तानने त्यांचा अखेरचा सामना जिंकला तरीही त्यांचे सहा गुण होतील आणि त्यांच्यापेक्षा जास्त भारताचे असतील. त्यामुळे पाऊस हा भारताच्या पथ्यावर पडू शकतो.

भारताला या सामन्यात पाऊस पडला तरी चालेल, पण एक गोष्ट जर घडली तर त्यांचे आव्हान संपुष्टात येणार आहे आणि ती गोष्ट म्हणजे पराभव. जर भारताचा या सामन्यात पराभव झाला तर त्यांचे सहाच गुण राहतील आणि त्यांना रनरेट तर कमीच आहे. या परिस्थितीत जर पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांनी जर आपले अखेरचे सामने जिंकले तर ते सेमी फायनलमध्ये पोहोचू शकतात व भारताचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे आता भारताचे आव्हान या विश्वचषकात टिकणार की नाही ही गोष्ट झिम्बाब्वेच्या सामन्यार अवलंबून असेल. त्यामुळे हा सामना भारताने जिंकला तर या सर्व गोष्टीचा विचारच टीम इंडियाच्या चाहत्यांना करावा लागणार नाही. त्यामुळे झिम्बाब्वेवर भारताने विजय साकारला तर ते सहजपणे सेमी फायनलमध्ये पोहोचू शकतात.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here