Uddhav Thackeray, केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचे उद्धव ठाकरेंच्या त्या वक्तव्यावर जोरदार प्रहार, म्हणाले… – union minister of state bhagwat karad criticizes uddhav thackeray in pune
पुणे : शिवसैनिकांनो, तयारीला लागा, राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता आहे, असे आदेश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला. मुंबईतील दादरमधील शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंनी राज्याभरातील संपर्कप्रमुखांसोबत बैठक घेतली. या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरेंनी मध्यवधी निवडणुकांचा अंदाज वर्तवत, तयारीला लागण्याचे आदेश दिले. उद्धव ठाकरेंच्या या आदेशावर आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीचा समाचार घेतला आहे. (bhagwat karad criticizes uddhav thackeray)
आता महाविकास आघाडी ही विरोधी पक्षात आहे. त्यांना बहुतेक भिती असेल की आणखी काही आमदार या सरकारमध्ये जातात का? म्हणून मध्यावधी निवडणूक लागेल असं ते म्हणत असतील. आमदारांना थांबवून ठेवण्याची ही त्यांनी आयडिया दिसत आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचे खंबीर सरकार आहे. ते आपला संपूर्ण कार्यकाल पूर्ण करेल आणि पहिल्या महाविकास आघाडी सरकार सारखं टाइमपास करणार नाही. दोन्हीही नेते मंत्रिमंडळासह फिल्डवर आहेत, चांगले निर्णय होत आहेत. चांगले निर्णय घेऊन महाराष्ट्राचा विकास जो थांबलेला होता तो विकास २०१४ ते २०१९च्या काळातील स्पीडने किंबहुना त्याहीपेक्षा जास्त गतीने होत आहे. असं कराड म्हणाले आहेत. दुबईत काम करणारे भारतीय रातोरात झाले करोडपती, जिंकले ५६ कोटी रुपये, रात्रभर लागली नाही झोप तर, महाविकास आघाडीचे अडीच वर्ष हा महाराष्ट्रासाच्या विकासाला लागलेला एक ब्रेक होता. आता महाविकास आघाडी सरकारचा ब्रेक बाजूला करून नवीन सरकार जे आलेल आहे ते अत्यंत चांगला विकास करेल आम्हाला खात्री आहे. असा विश्वास भागवत कराड यांनी व्यक्त केला आहे.
आज पुण्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित प्रधानमंत्री स्वनिधी आणि पुणे विभागीय बँकर्स समितीच्या बैठकीनंतर झालेल्या ते बोलत होते. बैठकीस खासदार उदयनराजे भोसले, श्रीरंग बारणे, रणजितसिंह नाईक हे उपस्थित होते.
राष्ट्रवादीमध्ये जर दम असेल…; सुधीर मुनगंटीवार यांनी दिले जयंत पाटील यांना थेट आव्हान दुसरीकडे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड म्हणाले, ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेचे अधिकाधिक प्रमाणात आर्थिक समावेशन झाल्यास देशाच्या अर्थकारणाला गती मिळेल. महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांना केंद्रीय योजनेचा लाभ देण्यासाठी आणि त्यासंबंधीची जागरूकता वाढविण्यासाठी विभागवार बैठका घेण्यात येत आहेत. फेरीवाल्यांचे बँकेत खाते, आधार आणि महानगरपालिकेत नोंदणी असल्यास त्यांना स्वनिधी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. प्रथम १० हजार रुपये कर्ज आणि वेळेवर परतफेड केल्यास नंतर २० हजार व त्यानंतर ५० हजार रुपये कर्ज देण्यात येईल. बैठकीत ठरविलेले उद्दिष्ट एका महिन्यात पूर्ण करून गोरगरिबांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.