मुंबई : राज्यात परतीच्या पावसानंतर आता थंडीची चाहूल सुरू झाली आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये असलेल्या थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रमध्येही हूडहूडी भरली आहे. पुणे, सातारा या भागांमध्ये तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळतं तर मुंबई, नवी मुंबई या भागांतही रात्रीच्या तापमानात घट झाल्याचं दिसून आलं. यामुळे एकीकडे पावसाचा अंदाज असताना दुसरीकडे राज्यात थंडीही वाढत आहे.

रविवारी पुण्यामध्ये १२.७ अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे तर सोमवारी तापमानाचा हाच आकडा निफाडमध्ये ११.८ वर पोहोचला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातही थंडीला सुरुवात झाली आहे. कोल्हापुरातही तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे राज्यात नोव्हेंबरमध्ये थंडी वाढेल असा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

सोशल मीडियावरील मैत्री प्रेमात बदलली, एकमेकांच्या खूप जवळ आले अन्…; संपूर्ण परिसरात खळबळ
दरम्यान राज्यातल्या सर्वात महत्त्वाच्या भागात म्हणजे महाबळेश्वरमध्ये चांगलीच थंडी वाढली आहे. महाबळेश्वर इथंही किमान तापमान १३ अंशापर्यंत पोहोचलं आहे. सध्याचे हवामान पाहता इथे पर्यटनाच्या दृष्टीने वाई, पाचगणी, भिलार, भोसे इथं पर्यटकांची संख्याही वाढ वाढली आहे.

धक्कादायक! पेपर वाचतानाच मृत्यूने गाठलं, काळजाचा ठोका चुकावणारा VIDEO समोर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here