ऍडलेड: गट साखळीत अव्वल ठरत भारतीय संघानं टी-२० विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. १० नोव्हेंबरला भारत वि. इंग्लंड सामना रंगेल. या सामन्यासाठी आयसीसीनं पंच आणि अन्य अधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली आहे. भारत वि. इंग्लंड सामन्यात पंच रिचर्ड केटलबोरो अम्पायरिंग करणार नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावर नेटकरी सुसाट सुटले आहेत.

आयसीसीकडून उपांत्य फेरीतील सामन्यासाठी अधिकाऱ्यांची घोषणा केली. १० नोव्हेंबरला ऍडलेडला भारत वि. इंग्लंड सामना रंगेल. त्यासाठी आयसीसीनं दोन पंच, तिसरे पंच आणि सामनाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा केली आहे. या सामन्यात कुमार धर्मसेना आणि पॉल रिफेल मैदानात पंच म्हणून काम करतील. तिसरे पंच म्हणून क्रिस गफ्फनी काम पाहतील. चौथे पंच म्हणून रॉड टकर जबाबदारी सांभाळतील. तर डेविड बून सामनाधिकारी असतील.
मॅच खेळण्यास आलेला क्रिकेटपटू अडकला हनीट्रॅपच्या जाळ्यात; व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी
भारत वि. इंग्लंड सामन्यात रिचर्ड केटलबोरो अम्पायरिंग करणार नसल्यानं भारतीय क्रिकेट चाहते आनंदात आहेत. कारण गेल्या काही वर्षांमध्ये रिचर्ड केटलबोरो भारतासाठी अनलकी ठरले आहेत. टी-२० विश्वचषक स्पर्धा २०२१, टी-२० विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये भारताचं आव्हान संपुष्टात आलं. २०१९ च्या विश्वषक स्पर्धेत बाद फेरीत भारतासमोर न्यूझीलंडचं आव्हान होतं. महेंद्रसिंह धोनी धावबाद झाल्यानं भारताचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. त्या सामन्यात रिचर्ड केटलबोरो पंच होते.
रोहित-विराट ‘बडे दिलवाले’, फ्लाईटमध्ये प्रवासादरम्यान आपली बिझनेस क्लास सीट पाहा कोणाला दिली….
२०१४ टी-२० विश्वचषक, २०१५ एकदिवसीय विश्वचषक, २०१६ टी-२० विश्वचषक, २०१७ चम्पियन्स करंडक स्पर्धेत भारत जेव्हा जेव्हा बाद फेरीत पराभूत झाला, तेव्हा तेव्हा रिचर्ड केटलबोरो पंच होते. सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ एकमेव सामना हरला आहे. दक्षिण आफ्रिकेनं गट साखळीत भारताचा पराभव केला. त्यात रिचर्ड केटलबोरो यांनी पंच म्हणून काम पाहिलं.

टी-२० विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीतील पहिला सामना न्यूझीलंड वि. पाकिस्तान यांच्यात होईल. ९ नोव्हेंबरला दुपारी दीड वाजता दोन्ही संघ आमनेसामने असतील. तर भारत वि. इंग्लंड सामना १० नोव्हेंबरला दुपारी दीड वाजता ऍडलेडमध्ये होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here