रत्नागिरी : होय तर…, आमचे काहीच योगदान नाही हो… आदित्य ठाकरे यांच्यामुळेच पक्ष उभा राहिला हो, आम्ही कोण? आमचा काय संबंध? आम्ही पाहुणे हो कालचे, असा उपरोधिक टोला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. कोकणावर जेव्हा संकट आले तेव्हा बाप आणि बेटे एक मुख्यमंत्री एक कॅबिनेट मंत्री होते. तेव्हा बाहेर नाही पडलात, आता बाहेर पडताय… तुम्ही या, सगळ्या प्रश्नांची उत्तरे आमच्याकडे आहेत, असा इशाराही रामदास कदम यांनी दिला. (ramdas kadam criticizes uddhav thackeray and aaditya thackeray)

शिंदे फडणवीस सरकारच्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना ते म्हणाले की, काही विलंब होत नाही. चांगले काम चाललेय. कोठे काम अडलेय का? असा प्रश्न करत गेल्या अडीच वर्षात काहीच कामे होत नव्हती. आता सगळी कामे फटाफट होत आहेत. चांगले काम सुरू आहे, पण तरीही मंत्रिमंडळ विस्तार हिवाळी अधिवेशनाआधी निश्चितपणे लवकरच होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कर्नाटक हायकोर्टाचा मोठा दिलासा; काँग्रेस, भारत जोडो यात्रेचे ट्विटर अकाउंट होणार नाहीत ब्लॉक
लोटे एमआयडीसीत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ऑफिस इथे नसले तरी आपण पर्यावरण मंत्री असताना दोन अधिकारी इथे कायम ठेवले होते. त्यांना निर्णय घेण्याचे सर्वाधिकार दिले होते. पण नंतर काय झाले मला माहिती नाही. मी प्रत्येक गोष्टीवर टीका करणार नाही, असे सांगत त्यांनी पर्यावरण खाते नंतर आदित्य ठाकरे यांच्याकडे गेले असे अप्रत्यक्षपणे सूचित केले.

मुख्यमंत्रीपुत्र श्रीकांत शिंदे खासदार जलील यांच्या कार्यक्रमात उपस्थित ; अनेकांच्या उंचावल्या भुवया
कोकणात मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या लोटे एमआयडीसीत पोलीस स्टेशनची आवश्यकता आहे. म्हणजे येथे काही होणाऱ्या चोऱ्या आदी गोष्टींवर अंकुश राहिला असता. ही मागणी यापूर्वी आपण केली आहे, पण हा प्रश्न पुन्हा आपण लावून धरू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोकणातल्या पर्यटन व्यवसायिकांनी काही काळजी करू नये, कोकणातील पर्यटनाचा विकास व्हावा, अशी भूमिका रामदास कदम यांनी मांडली आहे. तर अनिल परब यांची तक्रार रिझवान काझी या आमच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी केली आहे. वाळू व्यवसायात हप्ते हवे होते म्हणून ही तक्रार झाल्याचा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला. हे सर्व काझी याने समोर येऊन सांगितले आहे असेही कदम यावेळी म्हणाले. आता पुन्हा अनिल परब आणि रामदास कदम यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

निवृत्त न्या. चपळगावकर संमेलनाध्यक्ष, सुधा मूर्ती संभाजी भिडेंच्या पाया पडल्या… वाचा, मटा ऑनलाइनचे टॉप १० न्यूज बुलेटीन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here