मुंबई : खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अनियमित व्यायाम आणि धकाधकीचे जीवन अशा प्रकारच्या जीवनशैलीमुळे पक्षाघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. बऱ्याच प्रकरणांमध्ये पक्षाघातामुळे कायमचे अपंगत्व किंवा अचानक मृत्यू ओढवू शकतो. केईएम रूग्णालयांमध्ये दर महिन्याला २४०पेक्षा जास्त पक्षाघाताचे रूग्ण आढळून आले आहेत, ज्यामध्ये बहुसंख्य रूग्ण तरुण वयोगटातील आहेत.

केईएम रुग्णालयातील पक्षाघात विभाग प्रमुख डॉ. नितीन डांगे यांनी जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यामुळे भारतात पक्षाघातांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे सांगितले. तसेच विशेषकरून तरुण वयोगटातील रुग्णांची संख्या वाढल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. जंक फूड तसेच तळलेल्या पदार्थांचे सेवन, बैठी जीवनशैली, धूम्रपान, व्यायामाचा अभाव आणि मधुमेह मेलिटस, उच्च रक्तदाब आणि विस्कळीत लिपिड प्रोफाइल ही पक्षाघातामागील कारणे असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले. हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबधित आजारासंदर्भात जनजागृती आहे मात्र पक्षाघातांच्या लक्षणांकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते. त्यामुळेच तरुणांमध्ये पक्षाघाताचा धोका वाढल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

मुंबईकरांनो, ऑफिसमध्ये आज लेटमार्क लागणार, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
हे लक्षात ठेवा…

जेव्हा एखाद्या व्यक्तीला पक्षाघाताचा झटका येतो तेव्हा साठ सेकंदांत जवळजवळ मेंदूतील ३२००० पेशी नष्ट होतात. त्यामुळे पक्षाघातादरम्यानचा वेळ अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणूनच ‘एफएएसटी’ला खूप महत्त्व आहे.

‘एफएएसटी’ म्हणजे काय?

एफएएसटी (F.A.S.T) हे पक्षाघाताची लक्षणे ओळखण्यात मदत करणारे फेस-चेहरा, आर्म- हात, स्पीच- बोलणे आणि टाइम-वेळ याचे संक्षिप्त रूप आहे.

चेहरा : चेहऱ्याच्या एका बाजूला लकवा मारणे,

हात : एक हात उंचावण्यास त्रास होणे

बोलणे : वाचा पूर्ण जाण्याची लक्षणे

वेळ : वरील लक्षणांपैकी एकही आढळल्यास तातडीने रुग्णालयात नेणे. कोणतीही चिन्हे दिसली तर रुग्णवाहिकेशी संपर्क साधा, जेणेकरून गोल्डन अवरमघ्ये उपचार करणे शक्य होईल तसेच कायमचे अपंगत्व येण्यापासून वाचवता येईल.

बैठ्या जीवनशैलीमुळे हल्ली ४० ते ५५ वयोगटात पक्षाघाताचे प्रमाण वाढते आहे. मोठ्या संख्येने लोक रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलस्टेरॉलची पातळी नियंत्रित न करणे आणि पक्षाघात किंवा हृदयविकाराचा झटका यांसारख्या घातक समस्यांना बळी पडतात. साथीच्या आजारादरम्यान योग्य काळजी न घेतल्याने देखील पक्षाघाताला आमंत्रण मिळू शकते. पक्षाघातामुळे कायमचे अपंगत्व येऊ शकते किंवा मृत्यू ओढवू शकतो. हात कमकुवतपणा, अस्पष्ट बोलणे, अंग अशक्तपणा, चक्कर येणे, डोके हलकेपणा, चालण्यात अडचण, चेहरा सुन्न पडणे आणि शरीराच्या एका बाजूला अर्धांगवायू होणे, ही काही धोक्याची चिन्हे आहेत.

वेळीच निदान आणि आणि त्वरित उपचार यामुळे पक्षाघाताशी संबंधित गुंतागुंत होण्याचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात.

-डॉ चंद्रनाथ तिवारी

आव्हाडांना आव्हान देत मनसेकडून ‘हर हर महादेव’चा मोफत शो; ठाणेकरांची तुफान गर्दी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here