रातोरात कोट्याधीश झालेली व्यक्ती दु:खी आहे. केरळचे अनुप. बी २ महिन्यांपूर्वी एक सरकारी लॉटरी जिंकले. लॉटरी जिंकल्यानंतर त्यांच्या आयुष्यात अनेक बदल झाले. तब्बल २५ कोटी रुपयांची लॉटरी लागल्यानं सुरुवातीला अनुप यांना आनंद झाला. मात्र हळूहळू त्यांच्या आयुष्यात बदल होऊ लागले. त्यामुळे अनुप त्रासले आहेत.

लॉटरी लागल्यानंतर आयुष्यात अनेक बदल झाले. घरातून बाहेर पडल्यानंतर लोकांचं लक्ष माझ्याकडे असतं. अनेक मित्र आणि नातेवाईक नाराज आहेत, असं अनुप यांनी सांगितलं. दिवसभरात अनुप यांना अनेक जण भेटतात. त्यातील बहुतांश पैशांची मागणी करतात. अनुप यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये लॉटरी जिंकली. देशातील सर्वात मोठी सरकारी लॉटरी जिंकल्यानं नशीब फळफळलं.
गुवाहाटीत सापडले ४० खोके; बॉक्स उघडताच अधिकारी म्हणाले नॉट ओके, तपास सुरू
रिक्षा चालक म्हणून काम करणारे अनुप गेल्या १० वर्षांपासून लॉटरीची तिकिटं खरेदी करत आहेत. याआधी त्यांनी लहानसहान रकमेच्या लॉटरी जिंकल्या. सप्टेंबरमध्ये अनुप २५ कोटी रुपयांची लॉटरी जिंकले. तेव्हापासून अनुप यांचं आयुष्य बदललं. अनुप तिरुअनंतपुरमचे रहिवासी आहेत.

लॉटरी जिंकल्यानंतर लोकांचा दृष्टीकोन बदलला. त्यांचं वागणं बदललं. लॉटरी लागल्यावर शेकडो लोक भेटायला आले. सकाळी झोपेतून उठून घराबाहेर पडायचो, तर मोठी रांग लागलेली असायची. पहाटे ५ पासून लोक भेटायला यायचे. त्यांना आर्थिक मदत हवी असायची, असं अनुप यांनी सांगितलं.
भरधाव कारची बाईकस्वाराला धडक, फरफटत नेलं; भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद
लॉटरी जिंकल्यानंतर अनुप यांच्याशी अनेक माध्यमांच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला. त्यांची मुलाखत घेतली. जिंकलेल्या पैशातून लोकांची मदत करण्याचा विचार करत असल्याचं अनुप यांच्या पत्नी माया यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटलं. त्यानंतर अनुप यांच्या घराजवळ गर्दी झाली. कर्जफेडीसाठी, लग्नासाठी मदत करण्याचं गाऱ्हाणं अनेकांनी अनुप यांच्याकडे मांडलं. एक व्यक्ती तर रॉयल एनफिल्ड घेऊन द्या अशी मागणी करत दिवसभर घरात ठाण मांडून होता, अशी माहिती अनुप यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here