india vs england t20 world cup: टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पुन्हा एकदा विराट कोहलीची बॅट तळपली. अडचणीत असलेल्या भारतीय संघाची फलंदाजी कोहलीनं पुन्हा एकदा लिलया सांभाळली. कोहलीनं अर्धशतकी खेळी साकारली. कोहलीनं रचलेल्या पायावर हार्दिक पांड्यानं आक्रमक अर्धशतकी खेळी करत कळस चढवला.

विराट कोहलीनं सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत २५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. कोहलीनं अशी कामगिरी तीनवेळा केली आहे. इतर कोणालाच ही कामगिरी जमलेली नाही. आजचा सामना ऍडलेड ओव्हलवर होत आहे. या मैदानावर सर्वाधिक धावा करणारा पाहुणा फलंदाज कोहलीच ठरला आहे. ऍडलेडच्या मैदानावर कोहलीची बॅट नेहमीच तळपली आहे. तो सिलसिला आजही कायम राहिला. कोहलीनं आज ४० चेंडूंत ५० धावांची खेळी साकारली.
टी-२०मध्ये कोहलीनं ४ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. टी-२० मध्ये ४ हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम कोहली वगळता कोणत्याच फलंदाजाला जमलेली नाही. ११५ सामन्यांत १०७ डावांमध्ये कोहलीनं ४ हजार ८ धावा केल्या आहेत. कोहलीनं ५२.७४ च्या सरासरीनं आणि १३७.९७ च्या स्ट्राईक रेटनं विश्वविक्रमी कामगिरी केली आहे. १२२ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.