पतीच्या निधनामुळे धक्का बसलेल्या पत्नीनं प्राण सोडला आहे. अवघ्या चार तासांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्यानं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हृदय विकाराच्या झटक्यानं पतीचं अकाली निधन झालं. त्यामुळे पत्नीच्या मनावर मोठा आघात झाला. पती साथ सोडून गेल्याचं दु:ख त्यांना सहन झालं नाही.

 

couple died
मुंबई: पतीच्या निधनामुळे धक्का बसलेल्या पत्नीनं प्राण सोडला आहे. अवघ्या चार तासांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्यानं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हृदय विकाराच्या झटक्यानं पतीचं अकाली निधन झालं. त्यामुळे पत्नीच्या मनावर मोठा आघात झाला. पती साथ सोडून गेल्याचं दु:ख त्यांना सहन झालं नाही. पतीच्या वियोगानंतर चार तासांतच त्यांची प्राणज्योत मालवली.

मुंबईच्या विक्रोळीमध्ये वास्तव्यास असलेल्या बिणू कोशी (४५ वर्षे) आणि प्रमिला (४३ वर्षे) या पती पत्नीचा मृत्यू झाला आहे. बिणू दोषी यांच्या छातीत दुखू लागल्यानं त्यांना विक्रोळीतील आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सकाळी १० च्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आधी प्रेम विवाह ठरला, मग अचानक मोडला; प्रेयसीला व्हिडीओ कॉल करून तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
बिणू यांची प्राणज्योत मालवली त्यावेळी प्रमिला रुग्णालयातच होत्या. पतीच्या निधनाबद्दल समजताच त्या हमसून हमसून रडू लागल्या. त्यांना नातेवाईकांनी घरी आणलं. पतीच्या निधनाचा प्रमिला यांनी धसका घेतल्या. घरी आणल्यानंतर त्या बेशुद्ध पडल्या, अशी माहिती कोशी दाम्पत्याच्या शेजारी चांदवती श्रीवास्तव यांनी दिली.
उगाच लागली २५ कोटींची लॉटरी, फुकटचा त्रास नुसता! आधी आनंदात नाचलेला तो आता पुरता वैतागला
प्रमिला यांनादेखील आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण पतीच्या निधनाच्या दु:खातून त्या स्वत:ला सावरु शकल्या नाहीत. त्यांनादेखील हृदयविकाराचा झटका आला. दुपारी २ च्या सुमारास त्यांचा जीवनप्रवास संपला. कोशी दाम्पत्याला दोन मुलं आहेत. मोठा मुलगा २१, तर धाकटा १८ वर्षांचा आहे. दोघांचा मृत्यू नैसर्गिक असून त्यात काहीच संशयास्पद नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here