Maharashtra Bharat Jodo Yatra | मूळचे नाशिक जिल्ह्यातील महाडचे असलेले डॉ.सुबोध कांबळे हे लंडनमध्ये स्थायिक आहेत.तेथे त्यांना नागरिकत्वही मिळालेले आहे.तरीही ते या यात्रेत सहभागी होण्यासाठी भारतात आले. त्यांच्यासमवेत पत्नी भारुलता पटेल-कांबळे, मुलगा प्रियम कांबळे,आरुष कांबळे हेही आहेत.नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून ते यात्रेत सहभागी झाले आहेत.

 

NRI Bharat Jodo Yatra
भारत जोडो यात्रा

हायलाइट्स:

  • राहुल गांधी राजीव सातवांच्या घरी जाणार
  • सातव कुटुंबाचे गांधी घराण्याशी अत्यंत जवळचे संबंध आहेत
हिंगोली :राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे देशभरातील काँग्रेस पक्षाला सध्या चांगलीच ऊर्जा मिळत आहे. भारत जोडो या पैदल यात्रेपासून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एक नवीन चैतन्य संचारले आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या मतदारांमध्ये सुद्धा एक नवीन ताकद निर्माण झाली आहे. लहानापासून ते थोर मोठ्यापर्यंत सर्वजण भारत जोडो यात्रेत सहभागी होताना दिसत आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी देशाच्या कोनाकोपऱ्यातून नागरिक येत आहेत. मात्र, या सगळ्यांमध्ये एक कुटुंब सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. एक अनिवासी भारतीय कुटुंब तर थेट लंडनहून आले असून मागील सहा दिवसांपासून ते भारत जोडो यात्रेत पायी चालत आहेत.

मूळचे नाशिक जिल्ह्यातील महाडचे असलेले डॉ.सुबोध कांबळे हे लंडनमध्ये स्थायिक आहेत.तेथे त्यांना नागरिकत्वही मिळालेले आहे.तरीही ते या यात्रेत सहभागी होण्यासाठी भारतात आले. त्यांच्यासमवेत पत्नी भारुलता पटेल-कांबळे, मुलगा प्रियम कांबळे,आरुष कांबळे हेही आहेत.नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून ते यात्रेत सहभागी झाले आहेत.
डोक्यावर फेटा, अन् चेहऱ्यावर कुतूहल; राहुल गांधींनी अनुभवला कोल्हापुरकरांच्या रांगड्या कुस्तीचा थरार
याबाबत विचारले असता डॉ. सुबोध कांबळे म्हणाले, राहुल गांधी यांच्याबद्दल आदर आहे. त्यांच्याबद्दल कुतुहलही आहे. सध्या देशात जे वातावरण आहे, ते पाहता राहुल गांधी यांचे जे देश जोडण्याचे प्रयत्न आहेत. त्यांना साथ देण्याचा हा मनापासूनचा प्रयत्न आहे. त्यांचा प्रयत्न खुप महत्त्वाचा आहे.इतरही अनेक मुद्दे आहेत,त्यासाठी त्यांना पाठिंबा द्यायचा आहे. त्यामुळे मी देगलूर येथून या यात्रेत सहभागी झालो. महाराष्ट्रात ही यात्रा असेपर्यंत यात सहभागी होणार आहोत. भारुलता म्हणाल्या की,आमच्या भविष्यातील पिढीसाठी हा एक मोठा संदेश आहे. आम्ही विविधतेतून एकतेचा संदेश पाळला पाहिजे.अनेक भाषा, धर्म जाती आहेत.मात्र तरीही एकत्रित राहतो.आम्ही धर्म,जातीमध्ये विभागता कामा नये, असे त्यांनी म्हटले.
Bharat Jodo Yatra: राजीव सातव यांचं नाव उच्चारताच गर्दीत उत्साह संचारला, राहुल गांधीही भावूक

राहुल गांधी राजीव सातवांच्या घरी जाणार

सातव कुटुंबाचे गांधी घराण्याशी अत्यंत जवळचे संबंध आहेत. स्वर्गीय खासदार राजीव सातव (Rajeev Satav) हे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे अत्यंत विश्वासू आणि जीवलग होते. मात्र, करोना काळात नियतीने त्यांच्यावर घाला घातला. राहुल गांधी सातव यांच्या घरी येणार आहेत. सर्वांनाच राजीव सातव यांची प्रकर्षाने आठवण येत आहे. राजीव सातव यांची अभ्यासू राजकारणी अशी ओळख असल्यामुळे महाराष्ट्रात वेगळीच ख्याती निर्माण झाली होती. राहुल गांधी यांनी शुक्रवारी रात्री झालेल्या कॉर्नर बैठकीत राजीव सातव यांच्या आठवणींना उजाळा दिला होता.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here