Crime News: पोस्टमन, फळ विक्रेते बनून मुंबई पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या एका फ्लॅटमध्ये चोरी झाली होती. तब्बल ४२.३८ लाख रुपयांचं सोनं चोरीला गेलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना उत्तर प्रदेशातून अटक केली.

पोलिसांनी सर्व ९७ सिम कार्ड्सचा तपशील गोळा केला. त्यांच्या आधारे आरोपीच्या लोकेशनचा शोध घेण्यास सुरुवात केली. आरोपी उत्तर प्रदेशात असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथकं रवाना झाली. अमरोहा आणि बिजनोरमध्ये तपास सुरू झाला. पोलिसांनी पोस्टमन आणि फळ विक्रेते होऊन तपास सुरू केला. दिल्ली आणि नोएडामध्ये पोलिसांनी मुक्काम केला.
आरोपी ग्रेटर नोएडामध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीनं मुंबई पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सलमान अन्सारी, हैदर अली सैफी आणि कुशल वर्मा अशी आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून १८ लाख रुपयांचं सोनं जप्त केलं. याप्रकरणी पोलिसांनी चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल केले आहेत.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.