मुंबई : राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर ७२ तासांच्या आत दोन गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये एक विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. भाजपच्या महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने ही तक्रार दिल्याने आव्हाड यांच्यावर गुन्हा करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंब्रा येथील कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. कार्यकर्त्यांनी मुंब्रा बायपास रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त केला.

कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावरील कारवाईचा निषेध म्हणून पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. एकूणच जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेले गुन्हे चुकीचे असल्याची भावना व्यक्त केली जात असून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर काही तासांमधील हा दूसरा गुन्हा आहे. पहिला गुन्हा हा ‘हर हर महादेव’ चित्रपट बंद पाडल्याच्या मुद्द्यावरून दाखल झाला होता, त्याप्रकरणी त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली होती. मात्र, न्यायालयाच्या माध्यमातून त्यांना याप्रकरणी जामीन मिळाला होता. हे प्रकरण होऊन काही तास होत नाही तोच दूसरा गुन्हा दाखल झाला आहे.

भाचीसोबत केलं अमानुष कृत्य, नंतर व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवलेला फोटो पाहून कुटुंबीयांनी केला एकच आक्रोश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन गाडीजवळून बाहेर पडत असतांना भाजपच्या महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप आव्हाड यांच्यावर करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून त्यावरुन आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्वतः महिलेने तक्रार दिली असून गुन्हा दाखल झाला असून याबाबत आव्हाड यांनीही ट्विट करुन नाराजी व्यक्त केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत ही लोकशाहीची हत्या असून मी राजीनामा देणार असल्याचे जाहीर देखील केले असून आव्हाड यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

Jitendra Awhad: महिला मुख्यमंत्री शिंदेंना भेटली, अन सारी चक्रं फिरली; जितेंद्र आव्हाडांचा आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here